खटाव:-पुसेसावळी परिसरातील गावांना उरमोडीचे पाणी सोडावे : विक्रमशील कदम
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर :-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर :-7499265724
पुसेसावळी परिसरातील गावांना उरमोडीचे पाणी सोडावे : विक्रमशील कदम
पुसेसावळी :पुसेसावळी परिसरातील गावांना उरमोडीचे पाणी सोडावे याबाबतचे निवेदन पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवानेते,वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या नेतृत्वाखाली साताराचे उपजिल्हाधिकारी मा.प्रशांत आवटे साहेब आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिलारे साहेब यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की पुसेसावळी परिसरामध्ये पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याची पातळी अत्यंत खाली गेलेली आहे गोरगरीब जनतेला,शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बरोबरच हातातोंडाशी आलेली पिके वाळत चाललेली बघावी लागत आहे त्यामुळे या परिसरातील जनता मानसिक तणावाखाली असून यंदा उरमोडी धरण क्षेत्रात पाऊस काळ चांगला झाला आहे ते पावसाचे पाणी पुसेसावळी परिसरातील सर्व ओढे, नद्या-नाल्यांना सोडण्यात यावे म्हणजे लोकांना दिलासा मिळेल दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही परिणामी चारा छावण्या सुद्धा सुरू कराव्या लागणार नाहीत.
या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाने उद्या दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश देण्यात येतील शेतीचे नुकसान होऊ देणार नाही खटाव तालुक्यातील पाझर तलाव ,ओढे ,नाले उरमोडीच्या पाणी सोडून भरून घेण्यात येतील असे आश्वासन दिले निवेदन देताना वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश घार्गे, पुसेसावळीचे युवा नेते महेश पाटील, चोराडेचे युवा नेते श्रीकांत पिसाळ, रहाटणीचे बाळू आप्पा थोरात, रा.कुर्ले सरपंच प्रतिनिधी डी.के.माने, राजेंद्र माळवे, बबलू पाटील, दादा कदम, दादा कोकाटे, व्हा. चेअरमन दादासो घार्गे, सचिन पिसाळ फौजी, प्रशांत पिसाळ, जयवंत थोरात, निलेश माने, गोरेगाव वांगी सरपंच प्रतिनिधी नाना जाधव, बापूराव कदम, सचिन जगताप आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यासंबंधी आ.जयकुमार गोरे व धैर्यशीलदादा कदम यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पाणी सोडण्याकरिता वरिष्ठ पातळीवर दूरध्वनीवर संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा केला त्याचबरोबर विक्रमबाबा कदम यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मा.उपजिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल दुष्काळी जनता विक्रमबाबांना धन्यवाद देत आहे.