सिल्लोड:-सिल्लोड तालुका पंचायत समितीची आमसभा संपन्न.
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक
सिल्लोड तालुका पंचायत समितीची आमसभा संपन्न.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड तालुका पंचायत समितीची आमसभा ना.अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील शिवसेना भवन जवळील प्रांगणात पार पडली. या आमसभेत शेकडो लोकांनी आपल्या समस्या मांडल्या यावर ना. अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करून अनेकांच्या समस्यांचे जागेवर निराकरण केले.
आमसभेत शेतकरी सन्मान निधी, खरीप, अतिवृष्टी अनुदान, वीज समस्या, सिंचन व व्ययक्तिक विहीर, गायगोठा, पाणंद रस्ते, पाणीटंचाई, रस्ते दुरुस्ती, फेरफार नोंदी, रेशनकार्ड, वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तलाठी , ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांचे फोन न उचलणे, शासन स्तरावरील कामे वेळेत न करणे, कार्यालयात उशिरा येणे आदीं तक्रारींवरून ना. अब्दुल सत्तार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
गावकऱ्यांच्या शासन स्तरावरील विविध अडचणी , समस्या दूर करण्यासाठी येत्या 15 दिवसात गावागावात ग्रामसभा घ्या , ग्रामसभेत आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा असे निर्देश देत ग्रामसभेला संसदेप्रमाणे महत्व असून गावकऱ्यांनी ग्रामसभेत सहभागी होवून आपल्या अडीअडचणी मांडाव्यात असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले.
प्रशासकीय स्तरावरील येणाऱ्या अडचणी गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या सभेत ना. अब्दुल सत्तार यांनी जनतेचे प्रश्न एकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवा असे निर्देश दिले. प्रशासकीय कामात नागरिकांची कोणी अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक अडवणूक पिळवणूक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा ना. अब्दुल सत्तार यांनी दिला.
केंद्र व राज्याच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणारा सन्मान निधी पासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये, सन्मान निधी बाबतच्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, ज्यांना सदरील निधी मिळाला नाही त्यांनी आपले केवायसी करून घ्यावे असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले
या आमसभेत जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन बन्सोडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजयकुमार सोन्ने , पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता माळी, बाळासाहेब माळी, जि.प.बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावार, मुख्यमंत्री सडक योजनेचे उमेश लिंभारे यांच्यासह अजिंठा माजी सरपंच दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, माजी जि.प. सदस्य मुरलीधर काळे, दामूअण्णा गव्हाणे, कौतिक मोरे, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र ठोंबरे, सत्तार बागवान, डॉ. संजय जामकर, मारुती पा. वराडे आदिंसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. प.सदस्य, सोसोयटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसा सदस्य, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.