ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात मराठा रणरागिनी कुणबी मराठा आरक्षणाला विरोध म्हणून बसल्या आंदोलनाला.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात मराठा रणरागिनी कुणबी मराठा आरक्षणाला विरोध म्हणून बसल्या आंदोलनाला.

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला मराठा रणरागिनी व शिवकन्या तेजस्विनी चव्हाण यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वातंत्र्य आरक्षण द्यावे. अशी मागणी करून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन लक्षवेधी ठरलेले आहे. याबाबत माहिती अशी की गोजेगाव तालुका जिल्हा सातारा येथील तेजस्विनी भास्कर चव्हाण यांनी सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वातंत्रपणे आरक्षण द्यावे. या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांच्या या भूमिकेला वाढता प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. त्याचे कारणही असे की संविधानात्मकरीत्या आरक्षण हवे असेल तर जन्माने असणारी जात ही कधीही बदलता येत नाही. जर कुणबी मराठा असा जर दाखला घेऊन आरक्षण मिळेल. परंतु, भविष्यात आजोबाची जात हिंदू मराठा, वडिलांची जात 96 कुळी मराठा आणि मुलाची जात कुणबी मराठा अशा पद्धतीने एक वेगळे चित्र दिसून येईल. त्यामुळे संविधानातील मूलभूत तत्त्वानुसार व घटनेनुसार आरक्षण मिळणे हा आमच्या अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शासनाला वे टीस धरून आरक्षण मिळवायचे हा हेतू कुणीही मनात आणू नये. कारण, आतापर्यंत मराठा आरक्षण हायकोर्ट ,सुप्रीम कोर्टाने नाकारलेले आहे. दोन आयोगाने केलेले शिफारशी नाकारलेले आहेत. त्यामुळे जर आपल्याला खरोखर आणि गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर ते मराठा म्हणूनच देणे गरजेचे आहे. कारण मुळात आरक्षण किती टक्के मिळेल? हा पण मूलभूत प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गात ३६० पैकी २४ जाती राहिलेले आहेत आणि मराठा समाज साडे तीन कोटी आहे .त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे व संविधानात्मक घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण मिळाले तरच ते टिकणार आहे. कारण अ ब क ड असे गट पडले तर भविष्यात आरक्षण हे मराठा गोरगरिबांना मिळणार नाही त्यामुळे या आंदोलन किंवा हे जे आता जे राजकारण चाललेले आहे .त्याला कोणत्याच यश मिळणार नाही. असे ही त्यांनी ठणकावून सांगितलेले आहे. शिवकन्या तेजस्विनी चव्हाण यांच्यासोबत अंजली दत्तात्रय कदम या सुद्धा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खरं म्हणजे शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये शिकून सवरलेल्या मराठा शिवकन्याने घेतलेली भूमिका ही जरी इतरांपेक्षा वेगळी असली तरी त्यांच्या धाडसाचे खर म्हणजे कौतुक केले पाहिजे. संविधान रित्या आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाज आतापर्यंत राजकारणामध्ये यशस्वी ठरलेले आहे व राजकारणामध्ये सर्व सत्ता आपल्या हातात असावी यासाठीच प्रयत्न करत होता. त्यामुळेच सर्व समाजाचे कल्याण होण्याऐवजी काही घराण्याचे कल्याण झालेले आहे. याबाबत खरं म्हणजे गरीब मराठ्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे .पण असे न घडता सरसकट भावनिकरित्या आज सर्व ठिकाणी मोर्चा, आंदोलन, रॅली निघत आहे. माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे की, आपल्याला जर आरक्षण हवे असेल तर ते मराठा म्हणूनच मिळाले पाहिजे अन्यथा आपली समजूत काढण्यासाठी जर आपण कुणबी मराठा म्हणून आरक्षण जर स्वीकारले तर भविष्यामध्ये आपल्याला जो मानसन्मान व नैतिकदृष्ट्या आपण जे स्वतःला गाव गाड्यातून मुखिया समजतो. तो इतिहास पुसला जाणार आहे. याचीही नोंद घ्यावी. सध्या या त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय नेते व कार्यकर्ते फारकत घेत असून एक महिला आंदोलनासाठी बसली असताना इतर महिलांनी त्यांना पाठिंबा देणे यामध्ये काय गैर नाही. परंतु, जात ही माणसाला प्रत्येक ठिकाणी आडवी येते आणि याच गोष्टीमुळे आरक्षण देताना जात हा निकष पाहूनच आरक्षण देता येत नाही. हे सुद्धा अधोरेखित झालेले आहे. याचाही विचार करणे गरजेचे आहे. असे सूचित करण्यात आले आहे.दरम्यान, या रणरागिनी महिलांच्या आंदोलनाला जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा व राज्यकर्त्यांनीही पाठिंबा देऊन आपलं नैतिक कर्तव्य पाळले पाहिजे. अन्यथा प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणारी माणसं ही असे समजतात की प्रवाह माझ्या विरोधी दिशेने जात आहे. त्यामुळे त्यांना अधिक ताकद मिळते. असे मी आता समजत आहे असे ही त्यांनी प्रमुख पत्रकारांशी संवाद साधताना भावना व्यक्त केली. या आंदोलनाला स्वराज्य पोलीस मित्र व माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे, महेश शिवदास, संतोष कांबळे, स्वाती केळकर, सूरज खवळे, अरुणा लोखंडे,चंदूभाई सोनवणे,सुरेखा धोत्रे यांनी पाठिंबा दिला आहे.
————————————-

फोटो -मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण न देता हक्काचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या रणरागिनी (छाया- निनाद न्यूज सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button