ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाचा जन आक्रोश मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाचा जन आक्रोश मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात.

सातारा दि:-20/06/2023

कष्टकरी, शोषित, दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शासनाला जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पक्ष, रामदास आठवले गट यांच्यावतीने सातारा शहरात भर उन्हामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चा काढला. सातारा जिल्हा इतिहासात प्रथम हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची चांगली तारांबळ उडाली. याबाबत माहिती अशी की, नांदेड येथील अभय भालेराव तसेच मुंबईतील वस्तीगृहात राहणाऱ्या दलित मुलीवर अत्याचार झाला. वाढती गुन्हेगारी व अवैद्य गांजा विक्रीच्या विरोधात सरकारला जागे करण्यासाठी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व मातंग आघाडीचे किशोर गालफाडे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुस्लिम बांधवांनी या मोर्चात सहभागी होऊन या जन आक्रोश आंदोलनाला चांगली धार चढवली.
सातारा शहरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून हा मोर्चा पायी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. या वेळेला या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचे सादिक शेख, ख्रिश्चन समाजाचे पंकज खुडे, भालेराव तसेच व्ही द पीपल फॉर इंडियाचे जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील, प्रेमानंद जगताप हे सुद्धा मोर्चात सामील झाले होते. कोणत्याही मोर्चा असो किंवा आंदोलन हे सातारा शासकीय कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराजवळच आढवला जातो. परंतु मंगळवार दि, 200जून रोजी रिपब्लिकन पक्षाने काढलेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या मोर्चासमोर मान्यवरांनी आपला जन आक्रोश मांडला. या वेळी मयूर बनसोडे,मिलिंद कांबळे, आसिफ शेख, आण्णा वायदंडे, कुणाल गडांकुश, अजित साठे, गणेश वाघमारे, गौतमी मसणे, सौ.टोणपे, आशा तोरणे, मंगला खरात, एकनाथ रोकडे, सिद्धार्थ कांबळे, विकास जाधव तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा गेल्यामुळे पोलिसांनी तातडीने इमारतीचा दरवाजा लावला. त्यामुळे इमारतीच्या आत असलेल्या लोकांना बाहेर पडता येत नव्हते व जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या लोकांना इमारतीच्या आत जाता येत नव्हते. हा खेळ सुमारे एकता चालला होता.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आगेकूच केली. पण नियोजित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे कार्यालयाच्या बाहेर असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. या जन आक्रोश मोर्चासाठी वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, फलटण, पाटण ,कोरेगाव, माण, खटाव सातारा, कराड आदी परिसरातील कार्यकर्ते मिळेल ती वाहने घेऊन मोर्चामध्ये सामील झाले होते. सदरचा मोर्चा अत्यंत शांततेने पार पडला. विशेष म्हणजे रिपब्लिकन पक्षांनी बहुजन समाजावर होणारे हल्ले महिलांवर अन्याय अत्याचार वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्याविरोधात रणसिंग फुंकले . त्यामुळे सत्ताधारी शिंदे गट व भाजपची चांगलीच गोची झाली होती. खरं म्हणजे सत्तेत सहभागी होऊन सुद्धा रिपब्लिकन पक्षांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष सत्ता व विरोधी पक्ष अशा दोन्ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असल्याचे अनेकांनी सांगितले. यावेळीला मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
—————————————————-

छाया– सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयात रिपब्लिकन पक्षांनी मांडलेला ठिय्या

छाया- अजित जगताप सातारा

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button