कोरेगाव:-निवडणूक जिंकण्यासाठीच लढण्याचा आमदार शशिकांत शिंदे यांचा निर्धार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
निवडणूक जिंकण्यासाठीच लढण्याचा आमदार शशिकांत शिंदे यांचा निर्धार.
कोरेगाव दि: लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी २०२४ची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मला सर्वत्र जावे लागते. त्यामुळे मी जावली- कराडला गेलो. परंतु मी विधानसभा निवडणूक लढवणार असून ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याचा निर्धार आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले .कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कोरेगाव सातारा व खटाव तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळेला शिवाजीराव महाडिक , तेजस शिंदे, राजाभाऊ जगदाळे, जयवंत पवार, अरुण माने ,भास्कर कदम, संजय पिसाळ, समीर घाडगे, विक्रांत शिर्के, पंकज मिसाळ व तीन तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी विश्वास दाखवून कोरेगाव मतदार संघात उमेदवारी दिली होती. आज कोरेगावचे आमदार म्हणून केलेल्या विकास कामाची पुन्हा एकदा जनता पोच पावती देणार आहे .याबद्दल दुमत नाही. विकास कामाची स्वप्न व अमिषा दाखवून शिवसेना एकनाथ शिंदे गट आमदार महेश शिंदे यांनी निवडणुकीत निसटता विजय मिळवला. परंतु, मतदारांची भ्रमनिराशा केलेली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जशी फूट पडली तशी फूट इतर पक्षाचे पडली असली तरी जे निष्ठावंत आहेत. ही ओळख ही आमच्यासाठी पाठीवर थाप देणारी आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या अनुषंगाने साम-दाम-दंड-भेद विरोधात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात जे पक्ष सोडून गेले त्यांच्याबद्दल टीका करणार नाही .पण राज्याचा जेवढा अर्थसंकल्प आहे. तेवढा निधी कोरेगाव मतदार संघात आला आहे का नाही ? ही आता जनतेला ओळख पटलेली आहे. २०१४ रोजी गर्दी पाहण्यास मिळाली होती. आता गर्दी जरी तिकडे असली तरी निष्ठावंत म्हणून जो मला मानसन्मान महाराष्ट्रात आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांच्याबद्दल मला टीका करायची नाही. परंतु, जर विकास हवा असेल तर भावनिक होऊन चालणार नाही. असे त्यांनी आवाहन केले. सातारा येथील गादी मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची यशस्वीरित्या जाहीर सभा झाली या सभेला सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित होते या ऐतिहासिक सभेमुळे लोक सत्ताधाऱ्यांवर नाराज असून परिवर्तन होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. सातारा जिल्ह्यातही हेच परिवर्तन पाहण्यास मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक ही परीक्षेचा काळ असून १९ ऑक्टोंबर रोजी अंबवडे ता . कोरेगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होणार असून खासदार सुप्रियाताई सुळे व मान्यवर उपस्थित राहणार असून पाच हजार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.राजकीय,प्रशासनाचा दबाव, अमिषा ला बळी पडत आहेत. मतदार संघात मतदान नोंदणी, दुरुस्ती कार्यक्रम हाती घेण्यात यावेत. शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी गट आहे. राजकीय पटलावर २०२४ ची निवडणूक महत्वाची आहे.
अडचण आहे पण, निकाल जनता देईल. विश्वास ठेवतो. निकाल जनता देणार आहे.
स्पर्धा गट बाजूला ठेवून सर्व एकत्र आले आहेत. लढण्यासाठी पाच हजार मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हा अबाधित राखण्यासाठी संपूर्ण ताकद दाखवून देवू.
परीक्षेचा काळ, पक्ष फुटला नसता तर राष्ट्रवादी मुख्यमंत्री झाला असता. आता परिवर्तन अटळ आहे.
रमेश इंजे, प्रताप कुमुकले, पंकज मिसाळ, समीर राजे घाटगे, विक्रांत शिर्के, बाळासाहेब जाधव, सनी शिर्के, गोरख नलावडे, सचिन जाधव, निखिल यादव, जयवंत घोरपडे, भरत आवाडे, अमरसिंह बर्गे, बाळासाहेब फाळके, दिलीप बर्गे, डॉ नितीन सावंत, सागर जाधव,
मयूर देशमुख, अमोल सावंत आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————-
फोटो –