मायणी येथे मातोश्री सद्गुरु सरुताई यांचा रथोत्सव उत्साहात.
प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मायणी येथे मातोश्री सद्गुरु सरुताई यांचा रथोत्सव उत्साहात.
मायणी प्रतिनिधी (रथपूजन प्रसंगी बोलताना मा. आ. डॉ.दिलीपराव येळगावकर , सोबत मा.आ.प्रभाकर घार्गे सचिव रविन्द्र शेठ बाबर ,संजीव साळुंखे,सतीश भोसले व इतर ) मायणी येथील अलौकिक संत सद्गुरु सरुताई माऊलींचा दहाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त पालखी व रथोत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सद्गुरु सरुताईंच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ५ दिवस सरुताई लिला अमृत ग्रंथाचे पारायण,महिला भजन साधना,भारुड साधना, गौराई नृत्य सादर करण्यात आले.१५ सप्टेंबर या मुख्य दिवशी पहाटे ४: ३२ला महानिर्वाण समयी ह.भ.प.माणिक बुवा घाडगे पाचवडकर यांचे फुलाचे कीर्तन झाले.त्यानंतर माऊलीच्या जयघोषात त्यांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ठीक ११वाजता माऊलींचे नामस्मरण व आरती झाल्यानंतर मा.आ. प्रभाकर घार्गे,ट्रस्टचे चेअरमन मा. आ.प्रभाकर घार्गे, मा. आ. व ट्रस्टचे चेअरमन डॉ.दिलीपराव येळगावकर,सचिव रवींद्रशेठ बाबर व मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मा.आ.प्रभाकर घार्गे म्हणाले,मातोश्री सरुताईंचा महिमा अपार आहे.याचा अनुभव आपण घेत आहोत.लवकरच ट्रस्टच्या वतीने सद्गुरु सरुताई माऊलींचा साधना हॉल बांधण्यात येणार आहे.त्यासाठी मी रुपये १० लाख देणगी म्हणून देत आहे.यावेळी भवानी उद्योग समूहाचे शिल्पकार सी.एम.पाटील यांनी सरुताई यांच्या साधना हॉल साठी१लाखाची देणगी जाहीर केली. मा.आ.डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले, सरुताई माऊली ही सर्वांची आहे.आम्ही राजकारण विरहित काम करतो. या तीर्थ क्षेत्राला क दर्जा असून लवकरच ब दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी १ कोटीचा निधी शासनाकडून मिळवणार आहोत. या रथोत्सव कार्यक्रमात हत्ती, उंट, घोडे,झांजपथक आदींनी भक्तांची मने जिंकली.हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी डी. वाय.एस.पी.निलेश देशमुख , स.पो. नि. शितल पालेकर,नंदकुमार मोरे,संजीव साळुंखे,श्रीमंत पाटील,काकासाहेब मोरे,मोहन देशमुख,मानसिंगराव माळवे,युवानेते महेश कदम,सतीश भोसले, प्रशांत पवार,सदाशिव खाडे,सचिन जगदाळे,प्रा.भोसले सर,मंदार जोशी,विजय काळे, सूरज भंडलकर,अभिजित येळगावकर व त्यांचे सर्व कुटुंबीय,संजय गुदगे,उपसरपंच जगन्नाथ भिसे,आनंदराव शेवाळे,विजय कवडे,सूरज पाटील,नितीन झोडगे आदि उपस्थित होते. पांडुरंग तारळेकर यांनी प्रास्ताविक केले.संजीव साळुंखे व भोसले सर यानी मनोगत व्यक्त केले.राजू कचरे यांनी आभार मानले.पी.एस.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.