मायणी:-(खटाव)-राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर.
पत्रकार एकनाथ जाधव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार एकनाथ जाधव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर.
३७ वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार? पालकांचा सवाल.
मायणी :- प्रतिनिधी एकनाथ जाधव ,
येथील कचरेवाडी परिसरातील अंगणवाडी सेविका असणाऱ्या श्रीमती छाया आप्पासो चव्हाण यांचे विरुद्ध सातारा जि. प.महिला व. बालविकास विभागाकडे मायणी ग्रामपंचायतीन कामात अनियमितता व गैरसोय बाबत तक्रार दाखल केली आहे. परंतु संबंधित प्रकार राजकीय आकस ठेऊन संबंधित अंगणवाडी सेविका यांचा मुलगा भाजप पदाधिकारी असून मायणी ग्रामपंचायतिच्या गैरकारभाराविरुद्ध ते सातत्याने लढा देत असण्याच्या करणारे ,हा तक्रारीचा खटाटोप मायणी ग्रामपंचायत सरपंचांकडून करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी पालक नितीन पडळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्थानिक प्रशासनावर केला आहे .
या प्रसिध्दी पत्रकात असे म्हंटले आहे की, मायणी येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणारे विशाल चव्हाण यांनी मायणी स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे सातत्याने बाहेर काढले आहेत. संबंधित अंगणवाडी सेविका गेली ३६ वर्ष अविरहित कोणत्याही तक्रारीविना आपली सेवा देत आहे. त्यांच्या या सेवेत गावातील शेकडो विद्यार्थी – विद्यार्थिनी त्यांच्या पासून पुढील शिक्षणासाठी गेल्या आहेत. परंतु , याबाबत कोणत्याची पालकांनी तक्रार केलेली नसताना . मायणी ग्रामपंचायत सरपंचांनी भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांवरील आपला राजकीय द्वेष व्यक्त करताना आजच तक्रार का नोंदवली ? त्यांच्या सेवेच्या येवढ्या प्रदीर्घ कार्य सेवेत त्यांच्यावर तक्रार का नोंदवण्यात आली नाही. संबंधित तक्रार वृध्द अंगणवाडी सेविकेवर राजकीय आकसापोटी करण्यात करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
ज्या अंगणवाडी सेविकेवर करण्यात आलेल्या आरोपात संबंधित परिसर अस्वच्छ असल्याची एक तक्रार असून संबंधित परिसरातील सांडपाणी व नाल्याबाबत मायणी ग्रामपंचायतीविरुद्ध काही महिन्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून जाहीर आंदोलन करण्यात आले होते.हा प्रकार मंत्रालय पातळीवर गेला होता. ते काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच. गावातील सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना राजकीय द्वेषातून आपल्या कारभाराला विरोध करणाऱ्याच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या या मायणी ग्रामपंचायतीच्या अनेक भानगडी बाहेर काढणार असल्याचे पडळकर यांनी संगितले आहे.