ताज्या घडामोडी

महाराष्ट्र:-मराठी पाऊल पडले पुढे अभिजात भाषा दर्जाने महाराष्ट्राची शान उंचावली.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

मराठी पाऊल पडले पुढे अभिजात भाषा दर्जाने महाराष्ट्राची शान उंचावली.

मराठी भाषेला समृद्ध करणारे अनेक साहित्य होऊन गेलेले आहेत. ग्रामीण साहित्यिकांनी मराठी भाषा’जतन केली.
आज केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राची शान उंचावली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रीयन माणसांची ताकद लोकसभेला जशी दाखवली तशी विधानसभेलाही दाखवली तर महाराष्ट्राच्या पारड्यात आणखीन काही पडेल अशी प्रतिक्रिया येवू लागलेली आहे.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो
खरेच धन्य ऐकतो मराठी…’असा मराठी बाणा दाखवून अनेकांनी लोकसभेतही खासदार म्हणून मराठी भाषेत शपथ घेतली होती.
माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील विशेषतः महाविकास आघाडीच्या खासदारांनी सुद्धा लोकसभेत
आवाज उठवला आणि अखेर आज तो भाग्याचा दिवस उजाडला. गेल्या १०
वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित असणारा मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याबद्दलचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत अगोदरच अखेर केंद्राने मंजूर केला आहे. आजचा दिवस सर्व मराठी भाषा प्रेमींसाठी
गौरवाचा दिवस आहे.
महाराष्ट्र राज्यात काँग्रेसची सरकार
असताना मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित
करण्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी मराठीच्या समृद्ध इतिहासाचा सबळ पुरावा देणारा तज्ञांचा अहवाल ११ जुलै २०१४ रोजी केंद्राकडे सादर केला होता.
मागील दहा वर्षांत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेकदा केंद्रीय मंत्री व दस्तुरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पण, त्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवला नाही. मराठी भाषेला अभिजीत भाषा दर्जा देण्यासाठी दहा वर्षाचा काळ लागलेला आहे.
मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सुद्धा एकाकी लढा देऊन मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. आज त्यांच्या मागणीला यश मिळालेले आहे. आता महाराष्ट्रात श्रेयवाद सुरू झाला असून आमच्यामुळेच मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाल्याचे समाज माध्यमातून किती जरी सांगितले तरी मराठी माणसाला ते पटणार नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मराठी माणसांनी जर एकजूट दाखवली तर पुन्हा महाराष्ट्राच्या पदरी आणखीन काही पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची भाषा मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. प्राचीन काळापासून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या कालखंडामध्ये मराठी भाषेचे सौंदर्य खुलून निघाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वि वा. शिरवाडकर, पु ल देशपांडे , केशवसुत, माधव जुलियन,आचार्य अत्रे, बहिणाबाई चौधरी, ना धो महानोर, नामदेव ढसाळ ,फकीरुद्दीन बेंनुर , मुजफ्फर हुसेन, वि स खांडेकर, शिवाजी सावंत, प्राचार्य शिवाजीराव भोसले, यशवंत मनोहर, रणजित देसाई, शांता शेळके, बाबुराव बागल, गोविंद पानसरे, फादर फ्रान्सिस दिब्रोटो, मलिका अमर शेख, शंकरराव खरात, लक्ष्मण माने, शंकर पाटील, दया पवार, वाहरू सोनवणे, सुरेश भट अशा अनेक जाती-धर्मातील साहित्यिकनी मराठी भाषेचे सौंदर्य टिकवून त्यामध्ये आणखीन भर घातली आहे. मराठी भाषेची परंपरा आजही बहुजन समाज व ग्रामीण साहित्य जतन करत आहे. त्या सर्वांना मनस्वी आनंद झाला असून यापुढे आता मराठी भाषा अभिजीत भाषा म्हणून भारत देशामध्ये नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास नवोदित साहित्यिक व्यक्त करत आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button