छ. संभाजीनगर:-मा.मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने “ मेरी माटी मेरा देश … मिट्टी को नमन, विरो को वंदन ”
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक:-9834313401

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
प्रतिनिधी – गजानन पाटील काळे छ.संभाजीनगर
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने “ मेरी माटी मेरा देश … मिट्टी को नमन, विरो को वंदन ” या उपक्रमांचे अंतर्गत देशाचे स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देवुन लढा देणारे स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंब तसेच देशाच्या सिमांचे संरक्षण करणारे सशस्त्र व निमलष्करी दलातील सेवानिवृत्त सैनिक व देशसेवा करतांना आपल्या प्राणांची पर्वा न करता युध्दाचे समयी सिमेवर शत्रुशी लढा देवुन त्यांना दाहि दिशा चित्त करणारे शुरसैनिक तसेच युध्दात आपला सर्वोच्च पराक्रम दाखवुन भारतभूमी करिता स्वत:चे बलिदान देवुन हौतात्म्य पत्कारुन विरगीतीस प्राप्त झालेले सैनिकांच्या स्मृतीस व कुटूंबातील विरमाता, विरपत्नी तसेच पोलीस दलातील कर्तव्यार्थ शहीद पोलीसांच्या पत्नी, पाल्य व कुटूबांचे संवेदना जाणुन घेवुन त्यांनी केलेल्या त्यागाचा, बलिदांनाला उजाळा देवुन, आज ही पोलीस दल त्यांचे बलिदानाचे व त्यागाचे कायम ऋणी असुन कोणत्याही परिस्थीतीत याच्या बलिदानांची परतफेड करणे शक्य नाही.
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन आणि अध्यक्षतेखाली स्वातंत्र सैनिक तसेच सशस्त्र व निमलष्करी दलातील विरांचे स्मृतीस उजाळा देवुन त्यांचा व त्यांच्या कुटूंबीयांचा सन्मान व सत्कार करुन गौरव समारंभाचे आयोजन आज दिनांक 25/8/23 रोजी सकाळी 11:30 वाजेला गोकुळ, पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, औरंगाबाद ग्रामीण येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी देशसेवेसाठी स्वत:चे बलिदान दिलेले सैनिकांना व त्यांचे कुटूंबाला विन्रम अभिवादन केले तसेच देश सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचे मनापासुन आभार व्यक्त केले आहे.
तसेच मा. पोलीस अधीक्षक बोलतांना सांगितले कि त्यांचे वडील सुध्दा वायुदलाचे सेवेत होते. त्यामुळे वडील डयुटीवर गेल्यावर सैनिकांचे घरच्यांची होणारी घालमेल ही कशी असते यांची जवळुन प्रचिती त्यांना आहे. या भावनिक गोष्टी कोणीही शब्दात मांडु शकत नाही. कर्तव्यावर गेलेला सैनिक हा घरी परत येईलच याची कधीही शाश्वती नसते. परंतु सैनिकांचा जज्बा हा उच्चतम देशसेवेचा असल्याने आपल्या मातृभुमीच्या रक्षणासाठी कोणत्याही परिस्थतीशी सामना करायला ते तयार असतात. याप्रसंगी त्यांच्या कुटूंबाची अमूल्य साथ ही त्यांचे पाठीशी असते.
याप्रसंगी औरंगाबाद जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबातील सदस्य ज्यात सर्व स्वर्गीय हुतात्मा काशीनाथ पाटील म्हस्के, पंढरीनाथ पवार, किसनराव पडुळ, साहेबराव अण्णा पडुळ, लक्ष्मण पडुळ, विठ्ठलराव चव्हाण, पांडुरंग संभेराव, गोविंद कुबेर, गंगाराम तायडे, शेषराव शेळके, कौतिकराव शेजुळ, लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, दादाराव शेजुळ, भाषराव शेजुळ, तुकाराम जयाजी कुबेर, कपुरचंद दौलत चुगडे , इत्यादी यांचे कुटंूबीयांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला आहे .
तसेच सशस्त्र व निमलष्करी दलातील देशासाठी बलिदान देणारे शहीदांच्या कुटूंबातील विरपत्नी 1971 च्या युध्दात औरंगाबाद जिल्हातील पहिले शहिर जवान कडुबा बन्सोड यांच्या विरपत्नी चंद्रभागाबाई बनसोड, यांचेसह इतर विरपत्नी कमलबाई खरात, कांताबाई चंद्रभान पवार, कमलताई कुबेर, कमलबाई गायकवाड, संगिता देवरे, कमलबाई मानकापे, सुनिता खेडकर,सिुधू सरोदे, इत्यादींचा सन्मान करुन सत्कार करण्यात आला यावेळी विरपत्नीच्या भावना अनावर होवुन त्यांचे डोळे पाणावले.
तसेच माजी सैनिक सुदाम साळुंके, माधवराव सिरसाठ, शेषराव आराक, राजेंद्र बावस्कर, शेख नबाब, रामदास महालकर, अंबादास जाधव,निवृत्ती गायकवाड, सुधाकर देवमाळी, गजानन नाईकवाड, संभाजी चव्हाण, बाजीराव सोनवणे, कपिलदेव राऊत,दिलीप गंगावणे, यांचे सह 60 ते 70 सेवानिवृत्त माजी सैनिकांचा व कुटूंबाचा सन्मान करण्यात आला आहे.
नमुद कार्यक्रम प्रसंगी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. प्रकाश चौगुले, पोलीस उप अधीक्षक गृह, मा. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीमती पुजा नांगरे, प्र. पोलीस उप अधीक्षक, पोनि रविंद्र खांडेकर, रा.पो.नि. अण्णसाहेब वाघमोडे, सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे, विलास मोरे यांचे सह मोठया प्रमाणावर पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन परमेश्र्वर आढे यांनी केले आहे.