सातारा:-उपमुख्यमंत्री अजित दादांच्या तोंडी भाजपची भाषा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
उपमुख्यमंत्री अजित दादांच्या तोंडी भाजपची भाषा.
सातारा दि: महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वकांक्षी राजकारणी म्हणून ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी अनेकांना राजकारणात बळ दिले पण, आता त्यांचे पुतणे हे भाजपची भाषा बोलून ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या वर टीका करण्याची संधी सोडत नाही. याची आता अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सर्वात नवलाई ची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात येऊन शप.. शप .. म्हणजे शरद पवार असा जप करणारे कार्यकर्ते मात्र मौन धारण करून आहेत. ही बाब सुद्धा समोर आलेली आहे.
मुळातच ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे पुतणे म्हणून ६४ वर्षाच्या अजित दादा पवार यांना राजकारणामध्ये खूप मोठे यश मिळाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, बारामती लोकसभेचे खासदार, पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पद, विरोधी पक्ष नेते पद, असे सलग बत्तीस वर्ष सात वेळा आमदार ठरले.
अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्यापासून फरक घेऊन स्वतःची राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता अजित दादा पवार यांची साखर कारखाना संचालक पदी १९८२ साली निवड केली होती. त्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, अधिकाऱ्यांच्या बदल्या असे अनेक घोटाळे त्यांच्या नावावर असले तरी त्यांना अभय मिळत होते. आता तर ते सत्तेचे सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे शक्यच नाही. आज तसं पाहिलं तर ३८ व्या वर्षी त्यांनी निर्णय घेतला. मी तर साठी नंतर निर्णय घेतला? बिघडले कुठे? अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वर टीकास्त्र सोडलेले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्यावर त्यांचे पुतणे अजित दादा पवार यांनी टीका केलेली आहे.
या टिकेला सडेतोड उत्तर देणारी फळी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे राहिलेली नाही. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, सुधीर धुमाळ,अशोक शिंदे, मानसिंगराव चव्हाण, सयाजी पाटील, सदाशिव पोळ,सर्जेराव जाधव, मदन आप्पा पिसाळ, विलासराव वाठारकर, बाळासाहेब भिलारे, राजेंद्र शिंदे, मोहन तरडे, प्रदीप भोसले, ह. भ. प. दत्तात्रय कळभे महाराज , जी जी कदम अशी मजबूत फळी आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी होती. त्यामुळेच खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनला होता.
आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यात काही व्यावसायिक व बाजारू कार्यकर्त्यांचा भरणा झाल्यामुळे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पीछेहाट झालेले आहे. हे नाकारून चालणार नाही. राजकारणामध्ये पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्ति चाकरीला अत्यंत महत्त्व आलेले आहे. कारण, पक्षनिष्ठ मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हाती काही लागत नाही. पण व्यक्तीनिष्ठा जर तुम्ही जपली तर तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून ते ग्रामपंचायतीचे सदस्य पर्यंत संधी देणाऱ्या नेतृत्व तयार होते. त्यामुळे पक्ष पातळीवर ज्यांनी निष्ठा बहाल केलेले आहे. आज त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. हे अधोरेखित झालेले आहे .
अजित दादा पवार यांनी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर मार्मिक पण खरी जरी टीका केली असली तरी दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात. याचा अजितदादांनी विसर पडलेला दिसत आहे. शरद पवारांसारखं कवच कुंडल असल्यामुळे त्यांना अनेक पदे मिळाले. त्यांच्यापेक्षाही खूप मोठी गुणवत्ता असणारे अनेक राष्ट्रवादीचे नेते यांनी फक्त खासदार मंत्रिपद आमदार, पदावर समाधान मानले होते. त्यांचा कधीही विचार झाला नाही. जातीयवादी पक्षाला कधीही थारा देऊ नये. असे सांगणारे अनेक काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सध्या भाजपचे वळचणी खाली गेलेले आहेत. त्याला काही स्वाभिमानी नेते सुद्धा अपवाद आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये अधोगती किती होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अजित दादा पवार यांच्याकडे पाहिले जाते.
सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठी राजकीय उलथपालथी झालेली आहे. एकेकाळी बालेकिल्ला असणारे पक्ष आज दुफळी निर्माण झाल्यामुळे सबकुछ भाजप असे सध्या तरी चित्र दिसत आहे. मात्र डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच घुसमट झालेली असून लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आलेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे आता मुखवट्या मागील चेहरे आता समोर आल्याने लढाई लढण्याचे सामर्थ्य ज्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आता नव्या उमेदीने नव्या जोमाने आपली शक्ती पणाला लावून लढले पाहिजे. कारण आता ही लढाई वैचारिक पातळीवर आलेले आहे. त्यामुळेच तर आता वैचारिक लढाई लढताना वैचारिक भूमिका व वैचारिक बैठक सोडता कामा नये. हे सर्वांचे कर्तव्य ठरणार आहे. सध्या भाजपची भाषा अजित दादा पवार यांच्यासह सर्वांनाच जबरदस्तीने बोलावी लागत आहे त्यामुळे पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आता पुढील दिशा ठरवताना वेगळ्या उंचीवर जाऊनच विचार करणे गरजेचे आहे. हे मात्र खरे आहे.
——————————————-
चौकट—–सातारा जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार साहेब यांना मानणारे अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, श्री पवार साहेबांवर टीका करत असताना शांत बसणारे हे कार्यकर्ते कधीच जनतेचे होणार नाही. हे या निमित्त अधोरेखित झालेले आहे.
—————————————–
फोटो –