सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार बनवण्यासाठी महायुतीवर दबाव.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार बनवण्यासाठी महायुतीवर दबाव.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकाभिमुख योजना राबवण्यात आलेले आहेत . खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला झुकते माप निश्चित मिळणार असून सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी महायुतीवर दबाव असल्याचे चित्र दिसत आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण -खटाव व फलटण हे दोन मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यात सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये पाटण, कराड , दक्षिण , उत्तर व वाई -महाबळेश्वर – सातारा जावली, कोरेगाव हे मतदार संघ आहेत. विशेष बाब म्हणजे पाटणचे सुपुत्र व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे वाई- खंडाळा- महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व कोरेगावचे आमदार महेश शिंदे सातारा जावलीचे आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी मजबूत फळी महायुतीच्या सोबत असल्याने महायुतीचा खासदार शंभर टक्के निवडून येण्याचे संकेत मिळाले आहेत. वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वी एक दमदार नेतृत्व महाराष्ट्राला देण्यासाठी शिवसेना पक्षातूनच एक धाडसी निर्णय घेतला आहे. त्याला सर्वाधिक पसंती सातारा जिल्ह्यातून मिळालेली आहे .
त्याच अनुषंगाने आता आगामी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून किमान शिंदे गटाला १५ जागा मिळाल्या तर दिल्लीच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढणार आहे. त्या अर्थाने विषय बाब म्हणजे सातारा व ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाबाबत त्यांचा चेहरा मतदारांसमोर घेऊन जाताना त्यांच्या सातारा जन्मभूमीतील सातारा लोकसभा मतदारसंघ ताब्यात ठेवणे गरजेचे आहे .अन्यथा विरोधक हाच मुद्दा राजकीय करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सातारची जागा शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाला देणे संयुक्तिक ठरणार आहे. वास्तविक पाहता महायुतीमध्ये भाजप व अजित दादा पवार गट राष्ट्रवादी हे जरी सामील असले तरी इतर घटक पक्ष यांचा फारसा कुणी विचार करत नाही. परंतु, या महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी यांनी किती जरी दावा केला असला तरी सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची बांधणी व मतदारांचा कौल पाहता ही जागा शिवसेनेला सोडणे. म्हणजे विरोधकांची हवा काढणे. असाच प्रकार घडणार आहे.
तसं पाहिलं तर सध्या शिवसेनेकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव व सौ शारदाताई जाधव यांच्याबरोबरच काही शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या उद्योगपतींची नावे पुढे आलेले आहेत .पण सध्या तरी एकनाथ शिंदे हे निष्ठावंत व जुन्या शिवसैनिकांना संधी देतील असे एकूण चित्र दिसत आहेत. त्या अर्थाने सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी भाजप पक्षश्रेष्ठींना घ्यावीच लागणार आहे. तसं पाहिलं तर काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, प्रभाकर घार्गे ,शशिकांत शिंदे अशी नावे असली तरी प्रत्यक्षात त्या गटातून या नावाचा उल्लेख केला तरी त्यांचे समर्थक अथवा कार्यकर्ते फार उत्सुकतेने याबाबत बोलत नाहीत. याचाच अर्थ ही जागा शिवसेनेला जाण्याचे धोरण आहे का? असा आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
——————————++–+—-+——
फोटो —