टेंभू उपसा सिंचन योजनेतून माण खटाव तालुक्यातील गावांसाठी २.५ टी. एम.सी.पाणी आरक्षीत केल्याबद्दल वरकुटे – मलवडी ता.माण येथे कृतज्ञता सोहळा उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार, जलसंपदामंत्री मा.नामदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रतिनिधी :- अनमोल गुरव खटाव

टेंभू उपसा सिंचन योजनेतून माण खटाव तालुक्यातील गावांसाठी २.५ टी. एम.सी.पाणी आरक्षीत केल्याबद्दल वरकुटे – मलवडी ता.माण येथे कृतज्ञता सोहळा उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार, जलसंपदामंत्री मा.नामदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, बाळासाहेब सोळस्कर, अभयसिंह जगताप, सुभाष शिंदे, अर्जुन खाडे, जितेंद्र पवार, संदीप मांडवे, बाबासो पवार, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, युवराज सुर्यवंशी, प्रदीप विधाते, कविता म्हेत्रे, नंदकुमार मोरे, बाळासाहेब सावंत, अनुराधा देशमुख, बाळकृष्ण जगताप, प्रा.बंडा गोडसे, सोनाली पोळ, मनीषा काळे, सागर पोळ, विक्रम शिंगाडे, शहाजी बाबर, संजय खिलारे, सुरेश पाटील, संतोष घार्गे तसेच इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
गेली अनेक वर्ष टेंभू उपसा योजनेअंतर्गत या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, टेंभूचे पाणी आरक्षित करण्यासाठी प्रभाकर देशमुख सतत पाठपुरावा करत होते. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री मा.नामदार जयंत पाटील यांनी पाणी आरक्षित करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला, त्याबद्दल माण खटाव तालुक्याच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये माण तालुक्याच्या 30 गावामधील 5686 हेक्टर क्षेत्र तर खटाव तालुक्याच्या 27 गावांमधील 7440 हेक्टर क्षेत्र असे एकूण 13126 हेक्टर क्षेत्रासाठी 2.5 TMC पाणी आरक्षित करण्यात आले आहे