ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थान– भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थान– भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम.

सातारा दि: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नऊ दलाच्या ध्वजावर शिवमुद्रा कोरले गेलेले आहे आता सर्व नवदलाच्या सैनिकांच्या खांद्यावर शिवमुद्रा गौरवशाली चिन्ह दिसणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर सागरी किनारी संरक्षण मिळावं यासाठी सागरी किनाऱ्यावर तटबंदी बांधली.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही तटबंदी असून सागरी किनारी अनेक ठिकाणी अशा तटबंदी उभे आहेत. हा दूरदृष्टीचा इतिहास आहे
शिव मुद्रच्या आकाराचे नवीन बॅच लावण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यावेळी राष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवल्या बद्दल पंतप्रधानाचे अभिनंदन केले. ‘नौसेना दिनाच्या’ निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले व महाराजांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भावना व्यक्त केल्या.
गेल्यावर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावर महाराजांची मुद्रा लावली होती. यावर्षीच्या नौसेना दिवसाच्या निमित्ताने आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर ही मुद्रा असणार आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारकरांसाठी हा मोठा बहुमान असून खऱ्या अर्थाने जगभरात शिवाजी महाराजांची प्रतिमा पोहोचणार आहे.
मागील सत्तर वर्षात प्रथमच एक पंतप्रधान आपल्या नौसेना दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग वर आले . मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट, आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्याचे खुले होतात. असा सर्व विचार करून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. या अर्थाने शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात.
आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेली ब्रिटिशधार्जिणी मुद्रा आता भारतीय सैनिक वागवणार नाहीत. जिल्हाध्यक्ष पुढे म्हणाले गेले सत्तर वर्षे स्वतंत्र भारताची नौसेना गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करत होते ते गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासियांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल असा हा बदल करून दाखवला आहे.
आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिले सरकार आहे. आधुनिक भारताची नौसेना या कोकणाच्या भूमीत, निर्माण झाली, याची जाणीव ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूमीलाही वंदन केले. त्याच प्रमाणे कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात ठेवून. मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल उचले आहे. नौसेनेमध्ये सुद्धा नारी शक्तीला प्रोत्साहन देणे ही आमची प्राथमिकता आहे, त्यासाठी विविध योजना राबवित आहोत . अजून एक महत्वाची गोष्ट काल पंतप्रधानांनी नमूद केली ती म्हणजे लवकरच नौसेनेच्या रँक च्या नावा मध्ये बदल करुन गुलामगिरीची मानसिकता कायमची नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरासती प्रमाणे नावे दिली जाणार आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला

छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा येथील शिवतीर्थावर या आधुनिक मावळ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला आणि खऱ्या अर्थाने नौसेना दिवस साजरा केला. ऐतिहासिक कार्यक्रमाला यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम,सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी,जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार,प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुनीशा शहा,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,जिल्हा उपाध्यक्ष मनीषशेठ महाडवाले, रणजीत फाळके , अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे,जिल्हाध्यक्ष चित्रपट कामगार आघाडी विकास बनकर, बेटी बचाओ बेटी पाढाओ जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर,केमिस्ट फार्मा प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत,अनिता बोडस,प्रविण शहाणे,विक्रांत भोसले,विस्तारक अविनाश खर्शीकर,सुनील काळेकर,कृणालसिंह मोरे,रवी आपटे, अमोल टंगसाळे,विक्रम बोराटे,जयराज मोरे,कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

_____________________

चौकट -_______ सामाजिक जाणीव ठेवून भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी अत्यंत पोट तिडकीने आरोग्याची काळजी घेणाऱ्या आयुष्यमान भव कार्ड बद्दल जनजागृती करून किमान सातारा जिल्ह्यातील १८ लाख लोकांपर्यंत हे कार्ड पोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले आतापर्यंत फक्त पाच लाख आयुष्यमान भव कार्ड वितरित करण्यात आलेले असून उर्वरित 13 लाख कार्ड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व स्वयंसेवक व कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फोटो —–सातारा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना भाजप पदाधिकारी व पत्रकार परिषदेत माहिती देताना भाजप जिल्हाध्यक्ष देर येथील कदम विकास गोसावी विठ्ठल बलशेठवार सुविचार व शिवदामे हुबळीकर (छाया- निनाद जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button