आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला ते कराडचे सुपुत्र कराड उत्तरचे आमदार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री थोर स्वातंत्र्य सेनानी यशवंतरावजी चव्हाण साहेब…

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला ते कराडचे सुपुत्र कराड उत्तरचे आमदार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री थोर स्वातंत्र्य सेनानी यशवंतरावजी चव्हाण साहेब…

भारताचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि श्रीमती इंदिरा गांधी यांचे मंत्रिमंडळात गृहमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली महाराष्ट्रात सर्वांना बरोबर घेऊन विदर्भ असेल मराठवाडा असेल मुंबई असेल अशा सर्व भौगोलिक परिस्थिती वेगळी असताना देखील महाराष्ट्र राज्य निर्माण केले
*प्रतापगडावर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्याचं अनावरण केलं हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण लिहिण्यासारखा काळ होता.
खरं पाहिलं तर एक शेतकऱ्याचा मुलगा जोडीला स्वातंत्र्य सेनानी किसनवीर आबा
आदरणीय स्वातंत्र्यसेनानी वसंतराव दादा पाटील आदरणीय राजारामबापू पाटील यशवंतरावजी मोहिते भाऊ तसेच भाऊसाहेब हिरे आणि जेधे आदरणीय आनंदराव चव्हाण आदरणीय बाळासाहेब देसाई आदरणीय दादासाहेब जगताप आदरणीय पी डी पाटील आदरणीय आबासाहेब पार्लेकर आदरणीय भिकू नाना किवळकर आदरणीय संभाजी बाबा थोरात आदरणीय बापूसाहेब चव्हाण कोनेगावकर असे अनेक नेते यांच्या साह्याने महाराष्ट्र उभा केला शेतकरी उभा केला महाराष्ट्रात धरणे बांधली त्यातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळवले आणि *महाराष्ट्रात बहुजन समाजाची मुले शिकली पाहिजे म्हणून आर्थिक आर्थिक मागास म्हणून विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक फी माफ करून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करायची संधी दिली महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी केली शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून कृषी उद्योग एक सुरू केले मग ते साखर कारखाने असतील दूध संघ असतील तसेच सूतगिरणी असतील असे एक ना अनेक प्रकल्प उभे केले बहुजन समाजात नेतृत्व तयार झालं पाहिजे म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निर्माण केली त्यामुळे कार्यकर्त्यांना सत्ता समाजासाठी वापरण्याची संधी दिली* तसेच शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी सहकारी बँका उभ्या केल्या त्यातून शेतकऱ्यांना मदत होईल अशी व्यवस्था केली ठिकठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज फार्मसी आयटीआय आर्ट्स कॉमर्स सायन्स इत्यादी कॉलेज उभी केली त्यातून तरुण पिढी देश उभारणीसाठी तयार केली आणि आज जे *महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचेच आहे* म्हणून एक कृष्णा कोयनाच्या संगमावरील रमणारा तरुण स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतो महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री होतो देशाचा उपपंतप्रधान होतो यासारखी आनंदाची गोष्ट नाही परंतु 25 नोव्हेंबर रोजी त्यांचे दुःखद निधन झालं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुःखद घटना होती म्हणून अशा महान जननायक आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button