सातारा:-साताऱ्यात भाजप पक्षाच्या निवडीने काही कमळ निष्ठावंत पाकळ्या सुकल्या.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात भाजप पक्षाच्या निवडीने काही कमळ निष्ठावंत पाकळ्या सुकल्या.
सातारा दि: केंद्र व महाराष्ट्राच्या गतिमान राजकारणावर प्रभावी कामगिरी करून काँग्रेस मुक्त इंडिया व भाजप युक्त भारत अशी कामगिरी करणाऱ्या
भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच जिल्हा पातळीवरील निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांपेक्षा व्यक्तिपूजक व इतर पक्षातून भाजपवासी झालेल्या ८५ टक्के कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारणी संधी देण्यात आली आहे. दहा-पंधरा वर्षांपासून भाजपचा झेंडा हाती घेणाऱ्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहात भाजप मधील नाराज गटाची बैठक बोलावल्याची खात्रीलायक बातमी हाती आलेली आहे. खरं म्हणजे भाजप पक्षामध्ये सर्व अलबेला असल्याचे चित्र रंगवण्यात आले असले तरी सध्या भाजपमध्ये उभी फूट या निवडीमुळे दिसून आलेले आहे . एकेकाळी कमळाच्या पाकळ्या सुगंध देत होते पण आता याच कमळाच्या पाकळ्या चुकून गेल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाने आ. जयकुमार गोरे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांच्या खांद्यावर सातारा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिल्यानंतर भाजपमध्ये चैतन्य पसरले होते .असाच काहीसा प्रयत्न विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील ज्ञानदेव कदम हे करत आहेत. त्यांच्याच होम पीच मध्ये पुसेसावळी या ठिकाणी संतप्त तरुणांनी मशिदीवर हल्ला करून एका निरापराधीतरुणाचा बळी गेला .त्यामुळे अल्पसंख्याक व मागासवर्गीय मतदार सुद्धा नाराज झाले. असे असताना सातारा भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी निवड करताना १४ उपाध्यक्ष यांच्या निवडी केल्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी १४ वर्ष वनवास भोगल्यानंतर ते पुन्हा राज्य चालवण्यासाठी सक्रिय झाले. अशा पद्धतीने तर पक्षातून आलेले काही उपाध्यक्ष भाजप पक्ष वाढवण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाभारतामध्ये जशा पद्धतीने पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केला. अशा पद्धतीने पाच सरचिटणीस पदाची निवडी तसेच पंधरा चिटणीस, एक कोषाध्यक्ष जिल्हा संघटक आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी महिला मोर्चा ,अल्पसंख्यांक मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा व सेल म्हणजेच व्यापारी, सहकार, वैद्यकीय, जेष्ठ नागरिक, कायदा, भटके विभक्त, कामगार ,आरोग्य, आयटी सेल, उद्योग, आध्यात्मिक, प्रज्ञा, क्रीडा, शिक्षक, माजी सैनिक, सांस्कृतिक, दिव्यांग, जैन प्रकोस्ट (महिला) ,बेटी बचाव बेटी पढाव, चित्रपट कामगार ,पंचायत राज, सोशल मीडिया प्रभारी केमिस्ट फर्मा प्रकोस्ट, भटक्या विमुक्त महिला आघाडी, अभियंता आघाडी अशा सुमारे ३६ पदावरती तातडीने व विचार विनिमय करून निवडी करण्यात आले आहेत . तालुका व विधानसभा निहाय सतरा जणांची निवड केलेली आहे तर दहिवडी, कोरेगाव, कराड शहर रिक्त ठेवण्यात आलेले आहे. एकूणच या निवडीकडे नजर मारली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके निष्ठावंत भाजप कार्यकर्ते वगळता काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना या पक्षातून भाजपमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलेली आहे. हेच मूळ कारण निष्ठावंत यांच्या असंतोषांमध्ये दडलेले आहे. भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी पंधरा ते वीस वर्ष अनेक कार्यकर्त्यांनी गाव व शहर पातळीवर प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला आंदोलन केली आज याच काही प्रस्थापितांच्या नेतृत्वाखाली अशा निष्ठावंतांना पक्ष वाढवण्याची जबाबदारी न देता त्यांच्यावरती अविश्वास दाखवण्यात आलेला आहे असे बोलले जात आहे याबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात भाजपच्या निष्ठावंतांनी रणसिंग फुंकले असून त्यांचे कमालीचे ध्येय वाढलेले आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत भाजप निष्ठावंत विरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादीतून आलेल्या कार्यकर्त्यांचे डावपेच पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भाजप पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत सर्व कार्यकर्ते व महायुतीतील कार्यकर्ते एका दिलाने आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देतील असा विश्वास भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
______________________________
फोटो _भाजपचा झेंडा हाती घेऊन पक्ष वाढवण्यासाठी झटणारे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते (प्रतिनिधिक स्वरूपात फोटो)