मायणी:-व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज – मा.आ.डॉ दिलीपराव येळगावकर.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज – मा. आ.डॉ दिलीपराव येळगावकर.
मायणी : प्रतिनिधी ( फोटो) बी.ए.किंवा बी. कॉम.या पदव्या घेऊन बेरोजगार राहण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेऊन जीवनात प्रगती करा असे उद्गार मा. आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी मायणी येथे कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट चे उद्घाटन करताना काढले.याप्रसंगी प्रा.नागनाथ स्वामी हे अध्यक्षस्थानी होते.पवनपुत्र अकॅडमी चे संचालक किरण जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले.याप्रसंगी हणमंतराव साळुंखे पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे,मोहनराव देशमुख,तानाजीराव जाधव,संभाजी देसाई,चेअरमन मोहनराव दगडे,राजू कचरे,दिलीप पुस्तके,प्रकाश सुरमुख, पांडुरंग तारळेकर,स्वप्निल कांबळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ.येळगावकर म्हणाले,आज आपल्याला इमारती बांधताना पर राज्यातील कलाकार बोलवावे लागतात.पण आपल्या राज्यात कलाकार उपलब्ध होत नाही. याचे कारण दुर्लक्षच म्हणावे लागेल.व्यवसायास आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण शिकलो तर आपण स्वावलंबी बनू. यापूर्वी जुन्या काळात बांधलेल्या इमारती आपल्या राज्यातील कलाकारांनी च बांधल्या आहेत,मग आता का नाही याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. आग लागल्यानंतर ते विझविण्याचे कौशल्य प्राप्त होणे गरजेचे आहे,त्यासाठीच प्रा.किरण जाधव यांनी महाराष्ट्र हुतात्मा स्मृति दिनी या चांगल्या कॉलेजची स्थापना केली आहे.याचा लाभ अनेक तरुणांना होईल. प्रा.नागनाथ स्वामी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.ते म्हणाले आगी इतके भयानक काहीही नाही.इमारतीला लागलेली आग किंवा इतर कुठेही भडकलेला वणवा विझवणे फार अवघड आहे.त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे,ती सोय किरण जाधव यांनी मायणी मध्ये निर्माण केली आहे ही बाब कौतुकास्पद आहे. यावेळी संजीव साळुंखे,मोहनराव दगडे,संभाजी देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.राहुल कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर पांडुरंग तारळेकर यांनी आभार मानले.