खटाव:-ऊस दराबाबत वर्धन ऍग्रो कारखाना कमी पडणार नाही : धैर्यशील कदम.
पत्रकार अनमोल गुरव खटाव:-9881355582

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनमोल गुरव खटाव
ऊस दराबाबत वर्धन ऍग्रो कारखाना कमी पडणार नाही : धैर्यशील कदम.
चालू हंगामात चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट.
पुसेसावळी ( प्रतिनिधी) : वर्धन ऍग्रो कारखान्याची निर्मिती शेतकऱ्यांच्या मागणीतून झालेली आहे शेतकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ आम्ही वर्धनवर निर्माण केले आहे ऊस उत्पादकांनी अजिबात काळजी करू नये कारण यंदा ऊस दराबाबत इतर कारखान्यांच्या तुलनेत वर्धन ऍग्रो कारखाना कोठेच कमी पडणार नाही असे प्रतिपादन वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले.
खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन ऍग्रो कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम बॉयलर अग्नीप्रदीपन व मोळीपूजन या संयुक्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक भीमरावकाका पाटील, संपतराव माने, पृथ्वीराज निकम,सत्वशील कदम,संजय माने, सतीश सोलापरे,भीमराव डांगे, सुदाम दीक्षित,अविनाश साळुंखे,दीपक लिमकर,संतोष घाडगे,कार्यकारी संचालक विक्रमशील कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी चेअरमन धैर्यशील कदम आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सुनीताताई धैर्यशील कदम मा.सभापती खटाव, माजी जि.प.सदस्या व जिल्हा नियोजन मंडळ सदस्या यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न झाला.
धैर्यशील कदम पुढे म्हणाले, वर्धन कारखान्याचा गळीत हंगाम लवकर सुरू केल्याने दुष्काळी जनतेला दिलासा प्राप्त झालाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी थांबवण्यासाठी वर्धन कारखाना कटिबद्ध आहे डिस्टलरी सुरू करणे संदर्भात लागणारे सर्व सरकारी परवाने वर्धन कारखान्यास मिळाले असून येत्या काही दिवसात डिस्टलरीच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना कारखाना कार्यस्थळावर आमंत्रित करणार आहे, चालू गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी,ऊस- उत्पादकांनी मनात कसली शंका न बाळगता वर्धनला ऊस देऊन सहकार्य करावे.
यावेळी माजी जि.प.सदस्य व वर्धन कारखान्याचे जेष्ठ संचालक सुदामबापू दिक्षित यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्धनचे कार्यकारी संचालक पुसेसावळी जि.प. गटाचे युवा नेतृत्व विक्रमशील कदम यांनी केले तर आभार संचालक यशवंतराव चव्हाण यांनी मानले.
यावेळी शैलेश चव्हाण,महेश घार्गे, शुभांगी काकडे, दुष्यंत राजे शिंदे, धनंजय पाटील, श्रीकांत पिसाळ, हणमंत सुतार, मारुती यादव,श्रीरंग येवले,उदयसिह जगदाळे, नवीन जगदाळे, तात्या साबळे,रामचंद्र येवले, शरद चव्हाण आदिसह विविध गावचे सरपंच,उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व वर्धन कारखान्याचे सभासद उपाध्यक्ष शेतकरी ऊस तोडणी कामगार वाहतूक कंत्राटदार सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शब्द पाळणारे चेअरमन…..
धैर्यशील कदम यांनी वर्धन ऍग्रो कारखान्याच्या संबंधित सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार,तोडणी वाहतूक यंत्रणा आदि सर्व घटकांना आजपर्यंत दिलेले प्रत्येक शब्द पाळला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार वर्धन ऍग्रो कारखान्याच्या कामगारांची माहे ऑगस्ट पासून पगारवाढ झाली आहे त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वअधिकारी कर्मचारी चेअरमन धैर्यशील कदम यांना धन्यवाद देत आहेत.
भीमराव काका पाटील
ज्येष्ठ संचालक वर्धन ऍग्रो त्रिमली