ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
राहाता – राहाता तालुक्यातील बच्चु भाऊंचे प्रहार पदाधिकारी ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रश्नांबाबत तहसील मध्ये आक्रमक भूमिका घेत निवेदन सादर.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर
श्री.बच्चुभाऊ कडू
(कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्या निर्देशानुसार
- तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ , शेतकरी ,दिव्यांग बांधव व निराधार महिला यांच्या विविध समस्येवर प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका शिष्टमंडळाची बि.डी.ओ. कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी तब्बल दोन तास बैठक.
————
_(१) तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमधील , व इतर शासकीय कार्यालयातील नागरिकांना धमकवणारे फलक त्वरित हटवा , त्या ठिकाणी सेवा हमी कायदा व नागरिकांचे हक्क आणि सनद हे फलक प्रदर्शित करा . (२) दिव्यांग हक्क अधिनियम १९९५ अंतर्गत ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नाच्या ०५ % निधी दिव्यांगाच्या खात्यावर त्वरित जमा करा. (३) मिशन जलजीवन अंतर्गत सुरू असणारे कन्स्टक्शनचे कामात सर्रास वाळशेट (कचखडी) वापरलं जातं आहे ,त्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे होत आहे सबब या विधायक प्रकल्पात कोठेही कचखडी वापरता फक्त आणि फक्त वाळूचाचं वापरा करण्यात यावा . (४)निराधार महिला व अनाथ बालकांसाठी रुपये २००० /- महिना ,सुरू असलेली बालसंगोपन योजना तालुका स्तरावर पूर्ण क्षमतेने सुरू करा. (०५) सर्वसामान्य जनतेचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावे यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली व हालचाल रजिस्टर कार्यान्वित करा._
__________
“उपरोक्त तसेच इतर ११ मागण्यांवरून प्रहार जनशक्ती पक्षाने घेतला आक्रमक पवित्रा.”
———–
संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून अर्ध्या’ अधिक मागण्यांचा जागेवरच निपटारा . उर्वरित मागण्यांवर अधिनिस्त अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय कार्यवाही केली याचे लेखी उत्तर दिनांक १५ ऑगस्ट २०१२३ पर्यंत कळविणार असल्याचे पंचायत समिती राहाता येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन.