सातारा:-शोषित जातींनी आरक्षणाबाबत अंतर्गत संघर्ष करू नय- डॉ .भारत पाटणकर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
शोषित जातींनी आरक्षणाबाबत अंतर्गत संघर्ष करू नय- डॉ .भारत पाटणकर.
सातारा दि: महाराष्ट्रात कुणबी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शोषित जातीमध्ये संघर्ष होणे ही दुर्दैवी बाब असून शोषित जातीसमूहाने संघर्ष करू नये. कारण, शोषितांचा खरा शत्रू धर्मांध शक्ती आहे. त्यामुळे मी जाहीर आवाहन करतो की, शोषित जातींना आरक्षण मिळावे पण एकमेकात संघर्ष नको. असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महात्मा फुले यांनी कुणबी म्हणजे शेती करणारा या अर्थाने कोरडवाहू शेती करणारे कुणबी, बागायती शेती करणारे ते माळी कुणबी, आणि शेती आणि मेंढपाळे करणारे धनगर कुणबी, असे १८८१ च्या जनगणनेच्या उल्लेख करीत १८८४ चे मुंबई प्रेसिडेन्सीच्या गॅजेटमध्ये प्रत्येक जिल्ह्याची जात व विभागणी दिली आहे. त्यात काही ठिकाणी मराठा आणि कुणबी यांची वेगळी लोकसंख्या आहे.
सातारा जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या दिली असली तरी मराठा घटकांची संख्या वेगळी दिलेली नाही. मात्र सर्वच गॅजेटमध्ये इतर सर्व जातीची संख्या नोंदवलेली आहे. आज उच्च जातीय ९६ कुळी मराठा जातीचे लोकांनी कुणबी नसल्याचे जाहीर केले आहे .आणि कुणबी आरक्षणाला नकार दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील उच्च जातीय ९६ कुळी मराठा समाजाने एकत्र येऊन तसा ठरावच केला आहे. सातारा जिल्ह्यातील उच्च जाती ९६ कुळी मराठा यांनी सुद्धा मुख्यमंत्री यांचे याच प्रकारे स्पष्टीकरण केले आहे. त्यांचेच रेकॉर्ड शोधून तेवढ्याच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा आता स्पष्ट झालेला आहे.
मराठा मनवणाऱ्यांनी ओ.बी.सी. मधून आरक्षण नकोच आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून ठरणार आहे. ज्यांची कुणबी जात म्हणून पूर्वीपासूनच्या दप्तरात नाही. त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे ओ बी सी च्या बाहेर कोणी ओ बी सी मध्ये घुसडण्याचा प्रश्न येणार नाही. सर्व जिल्ह्याचे कुणबी शोध पडताळणी संपली की हा प्रश्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आंदोलन फक्त उच्च जातीय ९६ कुळी मराठा यांच्या पुरते न्यायालयात लढण्याचे शिल्लक राहते. ओ.बी.सी. जातीने आज तरी संघर्ष करण्याचा मुद्दा उरलेला नाही. सरसकट मराठी असे काहीच नाही. कारण, मराठा उच्च जातींना आता ओ.बी.सी. मधूनच आरक्षण मागणी न करता ५०टककेच्या बाहेर मराठा विशेष आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये १८८१ नुसार ५ लाख८३ हजार ५६९ कुणबी २४,५३९ माळी ४१,५४७ धनगर कोल्हापूर जिल्ह्यात- २ लाख ९९,८७१ कुणबी १४०७ माळी ६२,२८७ मराठा ३८,३२३ धनगर व सोलापूर जिल्ह्यात मराठा कुणबी १ लाख ८० हजार माळी२४०० व धनगर ५७ हजार आहे.
माझ्या पिढीला सामाजिक न्यायासाठी बंड करावे लागले. माझ्या पिढीतील अनेकांचे आजी-आजोबा यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आता मराठा- ब्राह्मण वगळून आरक्षणाच्या लाभ घेणाऱ्या सर्वांच्या परिस्थिती तपासणी झाली पाहिजे. जोपर्यंत त्यामध्ये बदल होत नाही. तोपर्यंत आरक्षण देणे गरजेचे आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज प्रत्येक घटक आपल्या जातीसाठी संघर्ष करताना दिसत आहे. परंतु, हा संघर्ष चांगला नाही. सर्व शोषित जातींना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. याच माध्यमातून सर्वांच्या आरक्षण थांबवणे हे बरोबर नाही. ही हुकूमशाही पद्धत आहे. आज तसं पाहिले तर मराठा म्हणून राजे राजवाडे व इतर ९६ कुळी मराठा असे फक्त १५० कुटुंबीयांमध्येच लग्न सोहळा पार पडतात. याची ही त्यांनी माहिती दिली.
जावळी तील निवळी, लमाज, चतुरबेट सींदी, पिंपळी कांदाटी व कोयना खोऱ्यात काही स्वतःला राव मराठे समजतात. त्यामुळे शासकीय रेकॉर्ड प्रमाणेच शासनाला काम करावे लागणार आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी दाखला देऊ शकत नाही. क्षत्रियांना आरक्षण मागण्याचा संबंध नाही. कारण, हा गरीब श्रीमंत हा प्रश्न नाही. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, जातीय शोषण होणाऱ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. याचे त्यांनी पुनरुचार केला.
—————————————
चौकट -डॉक्टर भारत पाटणकर यांच्या या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला मोजकेच पण अभ्यासू पत्रकार उपस्थित होते त्या सर्वांच्या प्रश्नाला त्यांनी ऐतिहासिक दाखले देऊन त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले.
——————————–
फोटो —–