खटाव:-तारळी आवर्तन बंद मुळे मायणी अनफळी परिसरात पाणी आले नाही शेतकऱ्यात नाराजी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके:-9890318605
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके
तारळी आवर्तन बंद मुळे मायणी अनफळी परिसरात पाणी आले नाही शेतकऱ्यात नाराजी.
मायनी प्रतिनिधी_तारळी उरमोडी उपसा जलसिंचन योजनेचे खटाव तालुक्यातील असलेल्या आवर्तनाचे नियोजन न झाल्याने तालुक्यातील मायणी अनफळे गावांना योजनेचे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी तारळी उरमोडी उपसा योजनेचे खटाव माण तालुक्याला पाणी देण्याचे धोरण निश्चित ठरले आहे. मात्र नेते निवडणुकीत गुंतल्याने याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे मार्च महिन्यात या योजनेचे आवर्तन सुरू झाले मार्च एप्रिलमध्ये खटाव ऐवजी माणलाच पाणी मिळाले होते. याबाबत तरुण भारत ने आवाज उठवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला पाण्यासाठी कालव्यावर आंदोलन सुरू केले व स्वतः पाणी सोडले. मात्र आवर्तन बंद होण्याची 10 मे तारीख निश्चित करण्यात आली संघटनेच्या धाकामुळे चार दिवस आवर्तन वाढवून मिळाले. 6 मार्च ते 15 मार्च अखेर खटाव तालुक्याला पाणी मिळाले मात्र या टोकाला असणाऱ्या मायणी अनफळे भागाला पाणी मिळाले नाही. त्यामुळे येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे.