राहता:-तेरा वर्षांपूर्वी या गावच्या ग्रामपंचायतने घेतलेला हा पूर्ण झाला असता तर आज हे गाव जगाच्या नकाशावर असते – पत्रकार वसंत काळे.
सह - संपादक आशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक आशितोष चव्हाण
तेरा वर्षांपूर्वी या गावच्या ग्रामपंचायतने घेतलेला हा पूर्ण झाला असता तर आज हे गाव जगाच्या नकाशावर असते – पत्रकार वसंत काळे.
वरील पत्र बघा आणि मग ठरवा कि वरील पत्रानुसार जर तेव्हा आपल्या गावातील पस्तीस एकर जमीन जर श्री.साईबाबा संस्थानने घेतली असती आणि जर तिथे हॉस्पिटल उभारले असते तर आज आपल्या गावचा किती कायापालट झालेला असता.पण तेव्हा या कामात घोड अडलं तरी कुठं असेल हे सर्व ग्रामस्थांना चांगलच माहित आहे.त्यामुळे त्या विषयावर मी काही बोलणार नाही..वरील पत्र सर्वांनी नीट वाचा मग तुम्हाला सर्व कळेल कि आज आपल्या गावचं किती मोठं नुकसान झालं आहे.आणि ते का झालं तर फक्त आणि फक्त गाव स्वतःच्या पायावर उभ राहू नये अशा राजकारणातून.२००८ साली माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतने गावात पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात या दृष्टीकोनातून साईबाबा संस्थानला आपल्या गावाने समस्थ ग्रामस्थ असलेली पस्तीस एकर जमीन हॉस्पिटलसाठी मोफत दिली होती.आणि ती साईबाबा संस्थानने घेऊन ती नावावर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावाही केला होता.व त्यानुसार महाराष्ट्राचे त्यावेळचे राज्यपाल यांनी २००९ च्या पत्रात आदेशही दिला होता कि साईबाबा संस्थानने या कामासाठी २००९/२०१० च्या विश्वस्त निधीतून खर्च टाकण्यात यावा व त्याचा तपशील त्या वर्षीच्या अहवालात देण्यात यावा.व हि सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण होतील हे कार्यकारी अधिकारी यांनी पाहावे.बघा सर्व काही एकदम बरोबर चाललं होत.आणि त्याप्रमाणे जर काम तेव्हा झालं असत तर आज आपल्या नांदूर्खी बु.गावचाच नाही तर आपल्या गावा बरोबर नांदूर्खी खु.या गावचा देखील खूप आपल्या गावा प्रमाणेच विकास होणार होता.वरील शासनाच्या पत्रात हा सर्व उल्लेख आपल्याला दिसेलच.आणि या पस्तीस एकरात हॉस्पिटल झाल्या नंतर सुद्धा आपली त्या ठिकाणी पंधरा एकर एकविस गुंठे जमीन शिल्लक राहणार होती.त्या उरलेल्या जमिनीवर आपल्या ग्रामपंचायतने गाळे बांधून खूप दुकानें एकच ठिकाणी चालू झाली असती.त्याच बरोबर आमदार निधी,खासदार निधी,ग्रामपंचायतचा अनेक प्रकारचा निधी हा सर्व निधी उपलब्ध करून त्याठिकाणी हॉस्पिटल स्टाफ साठी खोल्या उभारून खूप मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला उत्पन्न मिळाले असते.हॉस्पिटलचाही खूप मोठे टॅक्स आपल्या ग्रामपंचायतला उपलब्ध झाला असता.आणि हे सर्व जर ठरल्या प्रमाणे झाले असते तर आज आपली नांदूर्खी बु.आणि खु दोन्ही स्वतःच्या पायावर उभी असती.आणि त्याचा परिणाम असा झाला असता कि आज आपल्या गावात आज कोणत्याही सुविधेचा अभाव राहिला नसता.आपल्या गावातील खूप मुलही आज आपल्याच गावात हॉस्पिटल मध्ये नोकरीला असते.आज आपल गाव समृद्ध झालेलं असत.मग लोकांनी चांगला बारीक विचार करा कि इतके चांगले कामं आपल्या गावात होत असताना कुठ घोड अडलं असेल.कोणी असं होऊ नये यासाठी प्रयत्न करून हे कामं बंद केले असेल.का आपल गाव पुढ जाऊ नये त्यासाठी हा प्रकल्प सुरू होऊ दिला नाही….कोणी या प्रश्नाची उत्तर आपल्या गावातील सामान्य माणसांना देऊ शकेल का.काय काय सुविधा आपल्या गावात होणार होत्या त्या पुढील प्रमाणे…
१)गाव हागणदारी मुक्त होण्यासाठी घरोघरी शौचालय बांधने.
२)आपल्या दोन्ही गावात चोवीस तास नियमित वीज पुरवठा करणे.
३)गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरन करणे.
४)गावातील मारुती मंदिर परिसराची सुधारणा करणे.
५)साईभक्त पालखीसाठी गावात भक्त निवास उभारणे.
६)सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करणे.
७)आणि गावासाठी ज्या ज्या जीवनावश्यक पायाभूत सुविधा असतील त्या सर्व उपलब्ध करून देणे.
या सर्व सुविधा आपल्या दोन्ही गावात होणार होत्या.मग विचार करा कि आपल गाव आज जगाच्या नकाशावर असत कि नाही…आणि आज कुठं आपल गाव कुठं आहे.तरी आपण सामान्य माणुस आपले कामं सोडून नेत्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरत असतो..ह्या सर्व सुविधा जर तेव्हा आपल्या गावात झाल्या असत्या ना.आज जेवढा ग्रामपंचायतला आपल्या गावातून भाडे पट्टी कर वसुल होतो ना.त्यांच्या दुप्पट कर साईबाबा संस्थान मार्फत जमा झाला असता.आणि आपल्या गावची वार्षिक जमा होणारी उलाढाल हि कोटीच्या घरात असती…यात काही चुकलं असेल तर क्षमा मागतो…
*आपलाच नागरिक*
*वसंतराव पा.काळे*
९७६७६५३३०९