वाई:- विद्यार्थ्यांनी जागतिक आव्हानांना सामोरे जावे: शास्त्रज्ञ प्रा.(डॉ.) राशिनकर.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि. 28
विद्यार्थ्यांनी जागतिक आव्हानांना सामोरे जावे: शास्त्रज्ञ प्रा.(डॉ.) राशिनकर.
आधुनिक काळात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने असून त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या आव्हानाला सामोरे जावे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ प्रा.(डॉ.) गजानन राशिनकर यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘खेळातून रसायनशास्त्राचे शिक्षण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे हे होते. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, डॉ. संदीप वाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.राशिनकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधन व कौशल्याधिष्ठित शिक्षणावर अधिक भर दिला असून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करावे, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर आज मोठ्या प्रमाणात संशोधन झाले नसून मी व माझे सहकारी त्यावर संशोधनात्मक कार्य करीत आहोत. देशात व परदेशात नोकरीच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण न घेता पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेऊन व काही कौशल्य आत्मसात करून त्याचा लाभ घ्यावा. नोकरी मिळविताना बौद्धिकतेबरोबर कौशल्याधारित शिक्षण ही महत्त्वाचे असून त्याचा अंगीकार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. रसायनशास्त्र हा विषय तसा सोप्पा असून विविध खेळांच्या माध्यमातून तो शिकवल्यास विद्यार्थ्यांमध्ये त्याची आवड निर्माण होण्यास मदत होईल.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय विषयांचा समावेश केला असल्याने कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना इतर शाखेच्या विषयाचे ज्ञान आत्मसात करून स्वतःला बहुश्रूत बनवता येते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. (डॉ.) झांबरे यांनी डॉ. राशिनकर यांच्या संशोधनात्मक कार्याचा गौरव करून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप वाटेगावकर यांनी करून दिला. आभार श्रीमती दिपाली पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री. सोमनाथ सानप यांनी केले. या कार्यक्रमास श्रीमती प्रियांका जाधव, श्रीमती पूजा जायगुडे, श्रीमती निकिता सुर्वे, श्रीमती ऋतुजा भोईटे, श्रीमती धनश्री शिर्के, श्री. अजित पांढरे, भास्कर घोणे, अनिल सावंत, अनिल शेलार, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, शुभम पिसाळ आणि सचिन इथापे आदी उपस्थित होते.