खटाव:-मायणी परिसरातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणारच ____आमदार जयकुमार गोरे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी परिसरातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणारच ____आमदार जयकुमार गोरे.
मायणी प्रतिनिधी -खटाव तालुक्यातील विशेषतः मायणी परिसरातील सिंचनाचे प्रश्न अनेक वर्ष रखडलेले आहेत आता मी आणि डॉक्टर दिलीपराव येळगावकर आमचे वैचारिक मनोमिलन
झाले असल्याने टेंभू ,तारळी ,उरमोडी या योजनेतील सिंचनाचे प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याची ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी येथील
पाणी परिषदेत दिली
यावेळी खटाव म्हणजे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर (उपसभापती प्रतिनिधी सोमनाथ भोसले विशाल बागल भाजपा तालुका अध्यक्ष धैर्यशील चव्हाण सुरज पाटील राजेंद्र विकास बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार गोरे म्हणाले यावर्षी दुष्काळाजन्य परिस्थिती पाहता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही पाण्याचा साठा कमी असल्यामुळे मायणी तलावातून चांद नदीला आवर्तन सोडण्यात येईल तसेच सिंचनाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर मायणीसह 21 गावे व कलेढोणसह 27 गावे यांचा पाणी प्रश्न लवकरच मी आणि फक्त मीच मार्गी लावणार आहे तसेच ब्रिटिश कालीन कॅनॉलचे दुरुस्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तरळीची येणारी पाणी शेवटच्या टोकापर्यंत कसे पोहोचवले जाईल याविषयी आग्रही आहे कोणी कितीही उपोषण केली निदर्शने केली तरी मी माझे काम पूर्ण करणार आहे .
लवकरच मायणी शेजारील बाह्यवळण रस्त्याचे तीन कोटीचे टेंडर निघाले असून कोणी कितीही विरोध केला तरी ते काम मीच पूर्ण करेन त्यामुळे माहितीचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.
डॉक्टर येळगावकर म्हणाले टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावात आणण्यासाठी मी भगीरथ प्रयत्न केले आहेत परंतु आज दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्न मी आणि गोरे शासनाच्या पातळीवर सोडवणार आहे असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर रामजी आंबेडकर यांची यांचा स्मारकाचा प्रश्न येत्या तीन महिन्यात मार्गी लावणार असल्याचे सांगितले
यावेळी मोहन दगडे आनंदा शेवाळे विशाल चव्हाण मधुकर कचरे महादेव ढवळे बंडा घोरपडे गोपीनाथ पाटोळे विशाल चव्हाण कुमार महामुनी किसन गाडगे दीपक नामदे बापूराव मोहिते आदी उपस्थित होते तसेच यावेळी कलेढोण मायणी कलेढोण विखळे चितळी शेडगेवाडी गुंडेवाडी धोंडेवाडी गावचे शेतकरी उपस्थित होते राजाराम कचरे यांनी आभार मानले(पाणी परिषदेत बोलताना जयकुमार गोरे, डॉक्टर दिलीप येळगावकर टेंभू योजनेचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र रेड्डीयार दिसत आहे