छ.संभाजीनगर:-६०० मंडळे, एक लाख घरांमध्ये आज लाडक्या गणरायाचे आगमन.
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक
६०० मंडळे, एक लाख घरांमध्ये आज लाडक्या गणरायाचे आगमन.
शहर व परिसरात सुमारे 600 गणेश मंडळांनी बाप्पांच्या स्वागताची तयारी केली अाहे. सुमारे एक लाखाहून अधिक घरांमध्ये मंगळवारी ‘श्री’ची स्थापना होणार आहे. प्रशासनाने गणपतीच्या आगमनासाठी रस्त्यांचे पॅचवर्क, पथदिव्यांची दुरुस्ती केली. यानिमित्ताने मरगळ आलेल्या बाजारपेठेत नवचैतन्य आले आहे.
दडी मारलेला पाऊस गणरायाच्या आगमनासाेबत बरसावा, अशी प्रार्थना घरोघरी आणि मंडळात करण्यात येणार असल्याचे गणेशभक्तांनी सांगितले. विशेष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प अनेक मंडळांनी केला आहे. बाप्पाला मंडळात नेण्यासाठी ढोलपथकांनी तयारी केली आहे. शेकडो क्विंटल गुलाल आणि फुलांची विक्री झाली आहे.
५०० ते ६०० क्विंटल फुलांची आवक
गणरायाच्या आगमनासाठी ५०० ते ६०० क्विंटल फुलांची आवक झाली, असे फुलविक्रेते कृष्णा बनकर यांनी सांगितले. उकडीच्या दीड ते दोन लाख मोदकांची विक्री होणे अपेक्षित असल्याचे विश्वजित भावे म्हणाले. सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. ५ ते ८ कोटींची उलाढाल होऊ शकेल, असे नीलेश मालाणी यांनी सांगितले.
या ठिकाणी गणेशमूर्तींची विक्री
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदान, टीव्ही सेंटर चौक, गजानन महाराज मंदिर चौक, बजाजनगर, मुकुंदवाडी, बेगमपुरा, वाळूजसह अनेक ठिकाणी गणपती मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शाडू मातीच्या मूर्तींची मोठी मागणी आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी स्थानिक व बाहेरील पोलिस अधिकारी, सुमारे २ हजार ७०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोबतच एंट्री पॉइंटला तपासणी, फिक्स पॉइंट, छेडछाडविरोधी पथक आणि पायी गस्त असणार आहे. २५ ठिकाणी मुख्य फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.
पावसासाठी भक्त घालणार विघ्नहर्त्याला साकडे
निर्माल्यासाठी पिशव्या
पुढील दहा दिवस पूजेतून निघणारे निर्माल्य जमा करण्यासाठी प्रत्येक घंटागाडीसोबत मनपा वेगळ्या बॅगा देणार अाहे. दूर्वा, हार, प्रसादासह इतर निर्माल्य विहिरी, मोकळ्या जागांवर न फेकता घंटागाडीकडे द्यावे, असे आवाहन उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी केले. भंडाऱ्यातून निघणारा कचरा, उरलेले अन्न रस्त्यावर किंवा खुल्या जागेत न फेकता संबंधित प्रभाग अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी घंटागाडी पाठवून कचरा संकलित करू, असे त्यांनी सांगितले.