सातारा:-जिल्हा परिषद साताराच्या वतीने स्वच्छता ही सेवा या अभियाचा शुभारंभ जि.प.चे प्रशासक तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांच्या हस्ते संपन्न.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS Chief रिपोर्टर:9765698150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS Chief रिपोर्टर
सातारा दि.
केंद्र शासनाने दि.१५ सप्टेंबर ते २ आॅकंटोबर या कालावधित स्वच्छता हि सेवा उपक्रम राबविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुशाघाने जिल्हा परिषद सातारा च्या वतीने स्वच्छता ही सेवा या अभियाचा शुभारंभ जि.प.चे प्रशासक तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री महादेव घुले साहेब, श्री .संतोष हराळे साहेब, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , श्रीमती क्रांती बोराटे मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, श्री गौरव चक्के साहेब कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्षातील अजय राऊत. राजेश भोसले.ऋशिकेष शिलवंत.राजेश इंगळे.निलीमा सन्मुख गणेश चव्हाण हे तज्ञ उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी बोलताना मा ज्ञानेश्वर खिलारी सर म्हणाले कि या वर्षीच्या स्वच्छता हि सेवा अभियाना मुख्य उद्देश *कचरा मुक्त भारत* हा आहे. या अनुशंघाने प्रत्येक गावात पर्यटन स्थळे.तिर्थस्थळे. बाजार स्थळे शाळा आंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय परिसर अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ग्रामस्थांच्या मदतीने केली जाणार आहे. तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी या अभियान मध्ये सहभागी व्हावे असे अवाहन केले आहे.