खटाव:-खटाव – माण तालुक्यातील जनतेला राजकारणाची योग्य दिशा देणार – माजी आमदार प्रभाकर घार्गे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
खटाव – माण तालुक्यातील जनतेला राजकारणाची योग्य दिशा देणार – माजी आमदार प्रभाकर घार्गे.
मायणी प्रतिनिधी . ( मा.आ.प्रभाकर घार्गे यांचा सत्कार करताना को – चेअरमन मनोजदादा घोरपडे सोबत अभिजित देशमुख व इतर मान्यवर ) खटाव – माण तालुक्यातील जनतेला राजकारणाची योग्य दिशा देणार असे उदगार माजीआमदार प्रभाकर घार्गे साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी कारखान्याचे को – चेअरमन मनोजदादा घोरपडे होते. घार्गे पुढे म्हणाले,संपूर्ण देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्रात त्याहीपेक्षा जास्त अस्थिरता निर्माण झाली आहे.कोणत्याही राजकीय नेत्याच्या कार्यक्रमाला तेच तेच कार्यकर्ते दिसतात.त्यामुळे जनसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रावस्थेतून मार्ग काढण्यासाठी व तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणाला योग्य दिशा देण्याची गरज आहे,असे त्यांनी सांगितले. करखान्याबाबत बोलताना ते म्हणाले की,खटाव – माण आग्रो प्रोसेसिंग या कारखाण्याने अल्पावधीत चौफेर प्रगती केली असून सध्या दुष्काळाचे सावट असले तरी कारखण्यातील शेती विभागाने शेतकऱ्या मध्ये हा कारखाना आपलाच आहे याची जाणीव करुन देणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी चे उपाध्यक्ष संजीव साळुंखे यांनी आपले मनोगतामध्ये सांगितले की ,घार्गे साहेब तुम्हीच आता शिवधनुष्य हाती घ्या.आणि खटाव तालुक्यातील चाहत्यासह तालुक्यातील जनतेची आपल्याकडून अपेक्षा आहे.आपल्याला चांगली संधी मिळणे गरजेचे आहे.लोकसभा स्थापन झाल्यापासून खटाव – माण ,कोरेगाव तालुक्यातील एकाही उमेदवाराला प्रस्थापित राजकीय पक्षाने संधी दिली नाही किंवा या तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.अशा उपेक्षित तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने घार्गे साहेबांना संधी मिळणे गरजेचे आहे. कारखान्याचे को – चेअरमन मनोजदादा घोरपडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी,जिल्हा ग्राहक संघ,विविध विकास सोसायट्या सक्षम केल्या असून कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे.यावर्षी शेतकऱ्यांच्या ऊसाला २९०० रुपयांपेक्षा जास्त दर देण्याचा मानस असून येथील कर्मचाऱ्यांना ऑगस्ट पासून वेतनवाढ देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी १०० पेक्षा अधिक कार्य कर्त्यानी रक्तदान केले.त्यांना भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती वडूजचे संचालक अभिजित देशमुख,पंकज घाडगे,संचालक कृष्णत शेडगे मामा,महेश घार्गे,प्रकाश घार्गे,हणमंतराव घोरपडे, माजी सरपंच अजय सानप,किसन सानप,किसन मोरे,अजय मोरे,प्रकाश कणसे,नंदकुमार पुस्तके,पिनु राजमाने व असंख्य चाहते व कर्मचारी उपस्थित होते.कारखान्याचे सरव्यवस्थापक अशोक नलावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन केले. –