सातारा:-सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तीन दिवस वाढवून मिळण्याची रिपाइं ची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तीन दिवस वाढवून मिळण्याची रिपाइं ची मागणी.
सातारा दि,: सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता. खटाव या ठिकाणी एका दुर्दैवी घटनेमुळे सलग तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेले आहे .त्यामुळे घटनेचा वनवा पेटला नाही. ही बाब खरी असली तरी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इंटरनेट वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या १२ लाखा पेक्षा जास्त आहे. त्यामध्ये मजूर, कष्टकरी ,सफाई कामगार हातावर पोट असणारे कारागीर व गरीब लोक आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे दरमहा इंटरनेट शुल्क भरताना त्यांना 28 दिवसाचा इंटरनेट मिळतो. आता सलग तीन दिवस इंटरनेट बंद असल्यामुळे त्याचा वापर होऊ शकलेला नाही.
यावेळी सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दादासाहेब ओव्हाळ, अजित उमापे, सागर भिलारे, रोहित भिलारे, अतुल घोणे, रमेश गायकवाड,पत्रकार अजित जगताप व मान्यवर मंडळी यांनी लेखी निवेदन दिले.
सातारा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी इंटरनेट सुविधा बंद करण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर केलेला आहे. त्याबद्दल आमचं दूमत नाही. परंतु, न वापरलेल्या इंटरनेटचे शुल्क सर्वसामान्यांच्या माती लावणे. हा एक प्रकारे अन्याय आहे. त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांमध्येच आपण विविध इंटरनेट कंपन्यांना तीन दिवस अधिक इंटरनेट सेवा देण्याबाबत सूचना करावी. अशी नम्र विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ गट यांनी केली आहे. हे तीन दिवसाची इंटरनेट सेवा म्हणजे कोणत्याही जातीचे किंवा व्यक्तिगत पातळीवर प्रश्न नाही. तर हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे तीन दिवस इंटरनेट सुविधा लोकांना मिळाली तर अनेक लोकांना आर्थिक उदंड सहन करावा लागणार नाही.
अन्यथा न वापरलेल्या इंटरनेटचे साडेतीन कोटी रुपये म्हणजे एक प्रकारे एका घटनेने इंटरनेट कंपन्यांना दिलेला बोनस ठरणार आहे. ही बाब चिंताजनक आहे. तरी आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून जनमानसांमध्ये आक्रोश व आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. यासाठी लोकशाही मार्गाने व सामंजसाची भूमिका घेऊन रिपब्लिकन पक्षाने निवेदन दिले आहे.आहे. निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल हीच आशा अन्यथा जना आंदोलन नवीन नाही ही अगदी नम्रपणे सूचना करत आहे. असे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ गट सातारा जिल्हा यांनी केले आहे.
——————————————+———
सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दादासाहेब ओव्हाळ, अजित उमापे, सागर भिलारे, रोहित भिलारे, अतुल घोणे, रमेश गायकवाड,पत्रकार अजित जगताप व मान्यवर दिसत आहेत (छाया- शंकर कदम सातारा)