श्रीरामपूर:-महावितरणच्या मेन लाईनच्या तारा परस्पर तोडले प्रशासनाकहुन कारवाईसाठी टाळाटाळ सराला शिवारातील नागरिकाची होतेय गैरसोय.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष:-9921180022
महावितरणच्या मेन लाईनच्या तारा परस्पर तोडले प्रशासनाकहुन कारवाईसाठी टाळाटाळ सराला शिवारातील नागरिकाची होतेय गैरसोय.
महांकाळवाडगाव . येथील मेन लाइनवरील तोडण्यात आलेल्या तारा श्रीरामपुर . सराला शिवारातील चार रोहिताना वीजपुरवठा करणाऱ्या मेन लाईनच्या तारा महांकाळ वाडगाव येथील काही पदाधिकारी व काही नागरिकानी तोडलेचा आरोप सराला शिवारातील शेतकऱ्यांनी केला आहे याप्रकरणी प्रशासन कारवाई साठी टाळाटाळ करत असल्याचे ही या नागरिकांचे म्हणणे आहे याबाबत सरला येथील पीडित शेतकऱ्यांनी सांगितलेले की महांकाळ वाडगाव इथून सरला कडे चार रोहित्रांना मेन लाईनद्वारे वीजपुरवठा केला जातो दि 22 ऑगस्ट 2023 रोजी महांकाळ वाडगाव येथील काही पदाधिकारी व काही नागरिकानी या मेन लाईनच्या तारा परस्पर दांडगाई करुण तोडून टाकल्या . त्यामुळे सराला येथील चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद झाला दि 22 पासुन ते 25 पर्यंत चार दिवस या परिसातील वीजपुरवठा बंद होता या रोहिताच्या कक्षेत सुमारे 100 शेती कनेक्शन व सुमारे 200 घरे आहेत चार दिवस वीज नसल्यामुळे या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी देता आले नाही त्यामुळे पिके जळुन गेली या भागातील नागरिकांनी पाठपुराव केल्यामुळे दि 25 ऑगस्टनंतर महावितरणच्या दुसऱ्या लाईनवरुण सुरळीत केला . परंतु या बाजुने हा भाग टेल येत असल्यामुळे इतर वेळी तत्पर असलेले आधिकारी गेली कुठे इतर वेळी बसलो महावितरणाची अधिकारी जेव्हा बिल मागायला जातात तेव्हा केवळ हमरी तुमरी झाल्याचेही संबाधितावर गुन्हे दाखल करण्यास मागेपुढे पाहात नाही परंतु महावितरणाचे अधिकारी व पोलीस कारवाई करत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे व विजेचा दाब कमी असल्यामुळे या भागातील मोटारी सुरुही होत नाही त्यामुळे शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे परंतु प्रशासन लक्ष घायला तयार नाही नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर 13दिवसांनी महावितरण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिल्याचे शेतकऱ्यांना सांगितले परंतु पोलीस ठाण्यात चौकशी केली असता असा कोणताही अर्ज आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातअसल्याचे समोर येत आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे सरला परिसरातील दिलीप औताडे दत्तात्रय औताडे आस्तक औताडे देविदास वाघ जालिंदर औताडे सुरेश गवारे आबासाहेब थोरात देविदास वेताळ ज्ञानेश्वर वेताळ शंकर विटेकर अशा अनेक शेतकऱ्याची शेत पाण्या वाचून तडफडतेय ‘ जर लवकर विज कनेक्शन जोडले गेले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा नागरिकांनी महावितरण विभागाला दिला आहे.