सातारा:-साताऱ्यात मनसे कार्यकर्तेच बनले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रभावी पत्रकार,,,,,,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात मनसे कार्यकर्तेच बनले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रभावी पत्रकार,,,,,,,,,
सातारा दि: सध्या सोशल मीडियाने दुहेरी क्रांती केली आहे . अनेकांना हक्काचे माध्यम व विचारपीठ निर्माण करून दिले आहे. त्यामुळे सामाजिक जाणीव व प्रश्न सोडवण्यासाठी ”’ तुम्ही आला तर तुमच्या सोबत,,,,, आला नाही तर तुमच्या विना,,,, अशी आता नवीन क्रांती सुरू केली आहे. कराड येथील मनसे कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन स्वतःच इलेक्ट्रिक मीडियाचे प्रभावी पत्रकार म्हणून आपली बातमी विविध सोशल मीडियावर प्रसारित करून आपला हेतू सिद्ध केला.याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे .
कराड तालुक्यातील गुहागर -पंढरपूर महामार्गावरील कृष्णा नदीवरील नवीन पूल बांधण्यात आलेला आहे. या कृष्णा पुलावर विद्युत व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. याबाबत विद्युत मंडळ व जिल्हा प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना लेखी निवेदन देण्यात आले. लवकर या पुलावर विद्युत व्यवस्था करण्यात येईल दिसून आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव ,शहराध्यक्ष विश्वास संकपाळ, कराड तालुका अध्यक्ष साहिल नलावडे, ओमकार फुके ,अमोल कांबळे आधी मनसे पदाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून हे निवेदन दिले होते. सदर कृष्णा पुलाचे बांधकाम करून एक वर्ष पूर्ण झालेले आहे. कराड शहरातून गुहागर- पंढरपूर मार्ग या महामार्गावरील विद्यानगर, ओगलेवाडी भागाकडे जाणारा कृष्णा नदीवरील नवीन पुलावर विद्युत यंत्रणा नसल्याने अनेकांना या मार्गावरून जाताना अंधारात चाचपडत जावे लागत आहे. शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी या भागातून पायी प्रवास करतात.
याबाबत दिनांक ३० जून रोजी कराड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, कराड तहसीलदार कार्यालयातून याबाबत फारशी गंभीर दखल घेतली नाही. म्हणून अखेर मनसेने जिल्हा प्रशासनातील प्रमुख म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
सदर सामाजिक जाणीव ठेवून केलेल्या या कामाची दखल इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रसार माध्यमाने घ्यावी. अशी मनसे कार्यकर्त्यांची मापक अपेक्षा आहे. त्या पद्धतीने चांगल्या विचाराच्या प्रसारमाध्यमांनी त्याची दखल सुद्धा घेतली आहे .
सातारा जिल्ह्यातील सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमीच प्रसारमाध्यमाने प्रसिद्धी दिली आहे. सध्या स्थानिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक मीडिया व त्यांची सामाजिक जाणीव व कर्तव्य याबाबत आता संघटना सुद्धा परिचित झालेल्या आहेत. त्यामुळे कराडच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता कम इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार अशी दुहेरी भूमिका घेऊन ””’आपला लढा आपली प्रसिद्धी”” अशा पद्धतीने चांगले काम केले आहे .या त्यांच्या भूमिकेचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे. सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या सर्व संघटना व पत्रकारांनी सातारा जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या कोणत्याही पत्रकारांशी संपर्क साधून आपले वृत्त दिले तर त्याला प्रसिद्धी मिळते . त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही . परंतु मनसे कार्यकर्त्यांनी स्वतः चित्रीकरण करून आपली भूमिका सर्वसामान्य पर्यंत पोहोचवली आहे या त्यांच्या कृतीचे अधिकारी व पत्रकारांनीही मनापासून कौतुक केले आहे काही वेळेला व्यक्तिगत पातळीवर आरोप प्रत्यारोप जडत असताना त्याला महत्त्व देण्यापेक्षा अशा सामाजिक जाणीव इथून केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळते .हा सुखद धक्का असल्याचेही काही राजकीय नेत्यांनी बोलून दाखवले.
———————————–
फोटो- सातारा जिल्हा अधिकारी कार्यालया सोबत ध्वजसंपाच्या साक्षीने मनसे कार्यकर्त्यांनी शूटिंग करत असताना ( छाया- अजित जगताप, सातारा)