दहिवडी मध्ये श्रेय वादातून तृतीयपंथीयांना मिळाली संधी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
दहिवडी मध्ये श्रेय वादातून तृतीयपंथीयांना मिळाली संधी.
दहिवडी दि: पूर्वीच्या काळी राजकारण करत असताना विरोधकांचा सन्मान राखला जात होता. तसेच ज्यांनी काम मंजूर केलेले आहे. त्यांच्या हस्तेच उद्घाघाटनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडत होता. आता दुष्काळी परिस्थिती राजकारणामध्ये मानसिक निरागस गोरे ऐवजी काळेकृत्य सुरू झालेले आहे. त्यामुळे श्रेय वादातून दहिवडी मध्ये तृतीयपंथी यांच्या हस्ते दहिवडी नगरपंचायत इमारतीच्या मुख्यालयाचे एका उद्घाघाटनाच्या पूर्वीच पूर्वसंध्येला जय भवानी,,,, जय शिवाजी,, घोषणाबाजी करत कार्यक्रम करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, माण तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या दहिवडी मध्ये सर्व शासकीय यंत्रणांची कार्यालय आहे. तसेच अनेक गावातील लोक दहिवडी मध्ये येत असतात. या ठिकाणी दहिवडी गावचा विस्तार झाल्यामुळे त्याला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आलेला आहे. सध्या विद्यमान भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे दहिवडी नगरपंचायत इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर सत्तांतर झाल्यामुळे या इमारतीचे उद्घाघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते व्हावे. अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे शुक्रवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायत इमारत भूमिपूजन व इतर विकास कामे व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सर्व घडामोडी मध्ये भाजप बॅक फूट वर गेली आहे. माण- खटाव भाजप नेते व आमदार जयकुमार गोरे हे मध्य प्रदेशात असताना त्यांच्या काही समर्थकांनी एका तृतीयपंथी यांच्या हस्ते नगरपंचायत दहिवडी इमारतीचे उद्घाघाटन केले . सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये नवा पांडा पाडलेला आहे.
वास्तविक तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी आता सर्वत्र प्रयत्न करत आहेत. तृतीयपंथी यांना राजकारणामध्ये ही यशस्वी पदार्पण केले तर ते निश्चितच विकास कामे करू शकतात. हे चंद्रयान सारखे स्वच्छ आहे. परंतु, आपल्या राजकारणातील श्रेय वादासाठी त्यांचा उपयोग होत असेल तर त्याबाबत कुठेतरी खोलवर विचार करणे गरजेचे आहे. एका बाजूला या कामाची मंजुरी व श्रेय हे आमदार जयकुमार गोरे यांचे असताना त्यांच्या हस्तेच उद्घाघाटन व्हावे हे सांगणे संयुक्तिक आहे. त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही .ज्याने काम मंजूर केलेले आहे. त्यांच्या हस्ते उद्घाघा टन झाले पाहिजे या अर्थाने मग सन्माननीय तृतीयपंथीयांनी या कामाला मंजुरी देण्यासाठी हातभार लावला असेल म्हणूनच त्यांच्या हस्ते उद्घाघा टन केले गेले. यामध्ये कोणतेही गैर नाही .उलट त्यांच्या सन्मान केल्याबद्दल मनःपूर्वक संबंधितांचे अभिनंदन केले पाहिजे. अशा खोचक शब्दात काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे .
वास्तविक पाहता सध्या माण -खटाव दुष्काळी भागामध्ये काही गावांमध्ये पिण्याच्या पाणी व जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. याबाबत खरं म्हणजे केंद्र व राज्य सरकारने सहानभूतीपूर्वक पाहण्यासाठी पाहणी पथक पाठवणे गरजेचे आहे. परंतु, आता एकेकाळचे विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे जनतेला व मतदारांना वाऱ्यावर सोडले आहे की काय? असा प्रश्न पडलेला आहे.
खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी केंद्रामध्ये संरक्षण व कृषी मंत्री, विरोधी पक्षनेते , राज्याचे मुख्यमंत्री, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष ,आपत्ती व्यवस्थापन समिती अशा महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. दहिवडी नगरपंचायत ही ज्या भागात येथे त्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणूनही शरदचंद्र पवार साहेबांनी कामगिरी केली आहे. हे विसरून चालणार नाही. एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव असूनही माण -खटावच्या दुष्काळाबाबत फारसा लक्षवेधी असा विकास करता आले नाही. हे आता अधोरेखित झालेले आहे.
दुसऱ्या बाजूला ८० वर्षाच्या श्री शरदचंद्र पवार साहेबांना या वयात राजकारणामध्ये मैदानात उतरावे लागत आहे. याचा अर्थ त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना खूप मोठ्या मर्यादा आहेत. हे सुद्धा स्पष्टपणे जाणवू लागलेले आहे. एकूणच दुष्काळाच्या शाळेमध्ये वावरणाऱ्या माण तालुक्यातील जनतेच्या नशिबी आता सुडाचे राजकारण सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मनात एक वेळ घरी बसू . पण, असल्या खालच्या पातळी च्या मारी राजकारणाला साथ नाही . अशी मानसिकता तयार झालेले आहे.
———————————————————-
दहिवडी नगरपंचायत इमारतीच्या उद्घाघाटन प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय तृतीयपंथी व स्थानिक भाजप नेते गण (छाया- अजित जगताप, सातारा)