ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांची लगबग पण, साताऱ्यात दलित- कष्टकरी मतदार नाराज.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांची लगबग पण, साताऱ्यात दलित- कष्टकरी मतदार नाराज.

सातारा दि: सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष व संघटना दुय्यम फळीतील कार्यकर्ते निवडणुकीच्या लगबगीमध्ये लागले आहेत . तर दलित- कष्टकरी-अल्पसंख्याक मतदार नाराज असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे दलित मतदारांची नाराजी या निवडणुकीत खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारी ठरेल . अशी वाड्या वस्तीत चर्चा सुरू झालेली आहे.
राजकारणाचा कोणताही गंध नसलेले व आपल्या संसारात मग्न राहून काम करणारी बरीच कुटुंब आहेत. अशा कुटुंबातील मोजक्या मतदारांशी संवाद साधल्यानंतर वरवर वाटणाऱ्या निवडणुकीचा प्रचार तळागाळापर्यंत पोहोचलाच नाही. काही उमेदवारांचे चिन्ह सुद्धा पोहोचले नाही. हे जाणवू लागलेला आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर शेड्युल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष, डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरती ७०-८० वर्षांपूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती केली होती .सर्वसामान्य माणसांना निवडून देण्यासाठी त्यांनी राखीव जागेतून चांगलं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी निवडून आणले होते. साताऱ्यातून खंडेराव सावंत यांच्यासारखे तरुण आमदार झाले होते. आता तशी परिस्थिती राहिली नसून राजकीय दृष्ट्या दलितांवर अन्याय- अत्याचार वाढले आहेत. आरक्षणाच्या भूमिकेसाठी ज्यावेळेला दलित- कष्टकरी- शेतमजूर मतदार रस्त्यावर उतरतो. त्यावेळेला आरक्षणाचा लाभ घेणारे हे कधीही अशा आंदोलनात सहभागी होत नाहीत. आता मात्र निवडणुकीच्या काळात काही मुठभर नेते की, ज्यांच्या मागे त्यांची भावकी नाही. त्यांच्या घरातील नातेवाईक सुद्धा नाहीत. अशी मंडळी आता राजकारणामध्ये लोकांना मनोरंजन करण्यासाठी अनेक राजकीय पक्षाच्या युती- आघाडी यामध्ये स्वतःला गुरफटून घेऊ लागलेले आहे. येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू अशी अवस्था काही नेत्यांची झाली आहे .
आजच्या घडीला राजकारणात कोणीही शत्रू अथवा मित्र राहिलेला नाही. उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत व एम. आय. एम. चे खा. ओवी सी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही. अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. वैचारिक बैठक असणारे कार्यकर्त्यांचा अभाव असल्यामुळे बाजारू कार्यकर्त्यांची चलती झालेली आहे.
काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक डावलत आहेत असा आरोप करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्या संघटनेचे कार्यकर्ते इच्छुक उमेदवाराच्या बंगल्या भोवती गिरट्या घालून आपलं हीच साधून घ्यायचे. हे राजे रोस पणाने सुरू झालेले आहे. सन्मानाची वागणूक मिळत नाही. असे ज्या वेळेला बोलले जाते त्या बैठकीलाच उपस्थित असलेले काही मंडळी महायुतीच्या नेत्याच्या मेळाव्याला हजर असतात . हे कशाचं घोतक आहे ? याचे एकदा पडताळणी होणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये किमान अडीच ते तीन लाख कष्टकरी दलित शेतमजूर वर्गाची टक्केवारी मतदानातून स्पष्ट झाली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण २५ लाख ६३ हजार ७३७ मतदार आहेत. त्यामध्ये फलटण व माण हे दोन मतदार संघातील काही भाग हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. तर उर्वरित भाग हा सातारा लोकसभा मतदारसंघात आहे .
२०९ च्या पोटनिवडणुकीत १८ लाख ५० हजार३९३ मतदारांपैकी १२ लाख ३९ हजार ५४८ मतदारांनी मतदान केले होते. दोन बलाढ्य पक्षामध्ये झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला असला तरी अपक्ष मतदारांनी ही चांगली मते घेतली होती. ही मते खऱ्या अर्थाने मराठा ,दलित, ओ.बी.सी व कष्टकरी समाजाची होती. यंदाच्या निवडणुकीत मताची विभागणी झाली तर त्याचा नेमका फायदा कोणाला होईल हे चांगले कठीण झाले आहे. मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी जे आघाडी घेतील त्यांचा उमेदवार निवडून येईल असे अनुमान काढण्यात आले आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button