कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-उरमोडी पाण्यासाठी पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे तत्काळ दिले शेतकऱ्यांना आश्वासन.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

उरमोडी पाण्यासाठी पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे तत्काळ दिले शेतकऱ्यांना आश्वासन.
________________________________
पुसेसावळी, ता 14:: पुसेसावळी परिसरातील वडगाव चोराडे म्हासूर्ने पारगाव कुर्ले रहाटणी उंचीठाणे शेनवडी सह तब्बल वीस गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आज सातारा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन उरमोडी प्रकल्पाचे पाणी पुसेसावळी परिसरातील छोटे मोठे तलाव नालाबांध ओढ्याना सोडावे अशा मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की पूसेसावळी परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून या परिसरातील शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विहिरी कूपनलिका कोरड्या पडल्या असून वाड्या वस्त्यांवर जनावरांना पाणी मिळणे मुस्किल झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून उरमोडी प्रकल्पाचे पाणी मान तालुक्याला सुरू असल्याचे बोलले जात आहे मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या परिसराला हक्काच्या पाण्यासाठी लढा द्यावा लागत आहे या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांनी चार दिवसात निर्णय घेऊन पाणी सोडावे अन्यथा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वडी येथील उरमोडी प्रकल्पाच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन करणार आहेत यावेळी पुसेसा वळी गटातील मा जीप सदस्य जितेंद्र पवार मार्केट कमिटी सभापती सी एम पाटील सह्याद्री कारखान्याचे संचालक संतोष घार्गे संभाजी थोरात सचिन माने सुहास पिसाळ शिवाजीराव शिंदे कृष्णात पिसाळ सुरेश पाटील भाऊसाहेब लादे विजय पवार रावसाहेब माने लहुराज मदने व परिसरातील वीस गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून लवकरच पुसेसावळी परिसराला 21 तारखेला पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

चौकट:-कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून पुसेसावळी परिसरातील पाण्याच्या गंभीर प्रश्नावर चर्चा केल्याने जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले असल्याचे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button