खंडाळा:-का करावा लागतोय रियटर च्या कामगारांना 6 महिन्यात दुसऱ्यांदा संप ? कोण कारणीभूत आहे या संपला ? कोणी ठरवले संप कायदेशीर की बेकायदेशीर?
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष:-8390501946

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
का करावा लागतोय रियटर च्या कामगारांना 6 महिन्यात दुसऱ्यांदा संप ? कोण कारणीभूत आहे या संपला ? कोणी ठरवले संप कायदेशीर की बेकायदेशीर?
रियटर इंडिया प्रा. लि. या कंपनीतील रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनेचे सभासद असलेले सुमारे 350 कामगार गेली 13 दिवसांपासून संपावर गेले आहेत. आधी सातारा जिल्ह्याच्या कलेक्टरांच्या आणि आत्ता खंडाळा तालुका तहसीलदारांच्या आदेशाने 144 चे कलम लागू केले असल्याने खंडाळा तालुक्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे. या आदेशाचे पालन करत कामगार बिचारे धांगवडी येथील बळीराजा मंगल कार्यालय येथे एकत्र जमत आहेत व फक्त 5 कामगार कंपनीच्या गेटवर जाऊन शांततेच्या मार्गाने चक्री आंदोलन करीत आहेत.
संघटनेने केलेला हा 6 महिन्यातील दुसरा संप पण का करावा लागतोय? या कामगारांना सारखा सारखा संप या विषयी आम्ही संघटनेच्या काही सभासदांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रियटर इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाच्या कारस्थानाचा पाढाच वाचून दाखविला 2013 ते 2021 पर्यंत 10% टक्क्यापासून 4% टक्क्या पर्यन्त पगारवाढीचा घसरता क्रम, प्रॉडक्शन नसताना सुट्ट्या द्यायच्या आणि प्रॉडक्शनच्या काळात विनामोबदला एक्स्ट्रा शिफ्ट काम करून घेणे, कंपनी मध्ये अपघात झाला तरी त्याची कोणतीही भरपाई न देता उलट कामगाराच्याच मेडिक्लेम मधून त्याचा उपचार खर्च करायला लावणे, काम वाढून देण्यासाठी सतत कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, कामगाराच्या हक्काच्या सुट्ट्या सुद्धा व्यवस्थापनाच्या मर्जीनेच घ्यायला लावणे,नोकरीवर कायम टांगती तलवार सुरक्षिततेच्या बाबतीतील व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा व कामगारांना दिली जाणारी गुलामगिरीची वागणूक व अशा अनेक कारणांमुळे कामगारांना युनियन करावी लागल्याचे श्री. काकासो लांडगे यांनी सांगितले.
युनियन झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये व्यवस्थापणाने भरघोस पगारवाढ केल्याचे कामगारही नाकारत नाहीत. पण युनियन झाल्यापासून व्यवस्थापनाने संघटना मोडीत काढण्यासाठी कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, कामगारांच्या घरी जाऊन घरच्यांना धमकावणे, कामगारांना संघटना सोडण्यासाठी आमिष दाखवणे, अशा सर्व गोष्टी चालू होत्या, आणि ही पगारवाढ हा पण एक आमिषाचाच भाग होता. व्यवस्थापनाने पगारवाढ देण्याआधी काही कामगारांना HR ऑफिस मध्ये बोलावून तशी अमिषेही दाखवली होती. सतत संघटना फोडण्याचा प्रयत्न करणे,युनियनच्या पदाधिकाऱ्यांना व सभासदांना जाणूनबुजून त्रास देण्यासाठी आवश्यकता नसताना केवळ मानसिक छळवणूक करण्यासाठी ट्रेनिंग व डेप्युटेशनच्या नावाखाली सभासद व कुटुंब यांच्यापासून दूर ठेवणे,खोट्या आरोपाखाली फक्त आणि फक्त संघटनेच्याच लोकांना सस्पेंड करणे,पहिल्या संपात संप मागे घेतल्यानंतर दिलेली आश्वासन न पाळणे, फक्त संघटनेतील सभासदांच्याच विनाकारण चौकशा लावणे, कंपनीमध्ये काम करणाऱ्या संघटनेच्या सभासदांना त्रास देणे, त्यांना धमकावणे या सर्व गोष्टींना कंटाळल्यामुळे संघटनेला सहा महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा संप करावा लागत असल्याचे श्री. अविनाश जाधव यांनी सांगितले.
रियटर इंडिया प्रा.लि. ही कंपनी नावाजलेली कंपनी आहे.कंपनीच्या उत्पादन वाढीसाठी व कंपनीच्या हितासाठी कामगारांनी त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे 10 ते 12 वर्ष दुर्लक्ष केले. पण हा अत्याचार व्यवस्थापनामध्ये असणारे मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष श्री.किरण कटारिया हे कंपनी मध्ये आल्यापासून सुरू झाला आहे.कंपनीमध्ये स्वतःची हिटलरशाही राबवणे, कामगारांना अतिशय तुच्छ लेखणे, कमी पगारात कामगारांची पिळवणूक करणे, कामगारांच्या बाजूने बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कामगारांना कामावरून काढून टाकणे, संघटना मोडीत काढणे, या गोष्टींमुळे आधीच्या सर्व कंपन्यामधून यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु रियटर इंडिया या कंपनी मध्ये स्ट्राँग युनियन नसल्यामुळे इथे यांचा निभाव लागला. या काळात त्यांनी कामगारांचे अक्षरशः रक्त शोषले. आणि मागे झालेल्या आणि आत्ता सुरू असणार्या संपास हेच किरण कटारिया हे महाशय कारणीभूत असल्याचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी योगेश खामकर यांनी सांगितले.शिरवळ केसुर्डी येथील MIDC मध्ये असणाऱ्या कंपन्यांच्या नीरा व्हॅली या मनुष्यबळ (HR)च्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत,यांना HR ची संघटना चालते आणि कामगारांची संघटना का चालत नाही? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. कंपन्या बंद पडण्यामागे कामगारांचा हात नसून आशा हेकेखोर अधिकाऱ्यांचा हात असतो असेही हे पुढे म्हणाले.
संप बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हा मा. कामगार न्यायालय तसेच औद्योगिक न्यायालयाचा आहे. इतर कोणालाही तो अधिकार नाही. जर किरण कटारिया यांना संप बेकायदेशीर करण्याची खुमखुमी असेल व हिम्मत असेल तर त्यांनी याबाबत आपल्या बगलबच्चांना पुढे न करता, स्वतः मा. न्यायालयात आव्हान करावे. त्यामुळे व्यवस्थापन किंवा स्थानिक पुढाऱ्यांनी कितीही बोंबा मारल्या की, संप बेकायदेशीर आहे तरी तो अधिकार फक्त मा.औद्योगिक न्यायालयाला असल्याने, आम्ही बोंबा मारणाऱ्या कडे लक्ष देत नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्री.किरण गोळे यांनी म्हटले आहे.