खटाव:-सत्तेत असूनही रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यातील खड्ड्यात बसण्याची वेळ.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सत्तेत असूनही रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यातील खड्ड्यात बसण्याची वेळ.
पुसेसावळी दि: सर्वसामान्य माणसांना सत्तेचा फायदा व्हावा .यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. परंतु, खटाव तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार तक्रार व मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नाही . त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मयूर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली अखेर खटाव तालुक्यात रस्त्यावरील खड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या खटाव तालुक्यामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे .रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होणे हे नित्याची बाब झाली आहे . अपघातग्रस्त जखमी दवाखान्यात गेल्यानंतर खड्ड्यात गाडी पडली असेल असा सूर उमटत आहे. याची जाणीव सत्ताधारी पक्षाच्या ना कोणत्या पदाधिकाऱ्यांना ना कार्यकर्त्यांना आहे .त्यांनी चिंता करण्याची खर म्हणजे गरज असतानाही सत्तेमध्ये सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आठवडा झाला. तरी या रस्त्याबाबत दुरुस्ती करावी. अशी अक्कल अद्यापही संबधित बांधकाम विभागाला आलेली नाही.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर ज्या वेळेला एका वृत्तवाहिनीतून खड्ड्याचे चित्रीकरण होते. वृत्त पत्रात बातमी वाचली जाते.त्यावेळी जनाची नाही पण मनाची लाज राखून महामार्गाची तातडीने दुरुस्ती केली जाते. हाच निकष मात्र, खटाव तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट आंदोलनाबाबत होताना दिसत नाही. दरम्यान, ज्या ठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले आहे त्याच रस्त्यातून सत्ताधारी पक्ष कार्यकर्त्यांच्या वर्दळ वाढली आहे.त्यांनी आंदोलन बाबत माहिती घेऊन या रस्त्याची तातडीने उपाय योजना करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी वाहन चालकांनी केलेली आहे.
खटाव तालुक्यातील चोरडे ते म्हासूर्णे , पुसेसावळी ते गोरेगाव (वांगी) व कळंबी ते औंध या रस्त्यावर खड्यात बसून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले . यावेळी सागर जाधव , अभिजित जाधव ,आकाश खांडेकर ,राजेश खांडेकर ,प्रकाश सोराटे सूरज कोकाटे, रमेश यादव , रोशन जाधव ,प्रसाद जाधव ,भैया राव जाधव , शाम बुधावले गणेश खांडेकर , रोहित नलवडे ,ओमकार कांबळे ,अजय उमापे हे उपस्थित होते. पाच दिवसांचा कालावधी गेला तरी अद्याप ही रस्त्याची दुरावस्था थांबली नाही. त्यामुळे सत्ताधारी म्हणजे काम करण्याचे ध्येय नसलेले टोळी असा शेरा वाहन चालकांनी लगावला आहे.
———————————————————-
फोटो-खटाव तालुक्यात रस्त्याच्या कामासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ,, (छाया – निनाद जगताप, सातारा)