कराड:-रयत स्वाभिमानी संघटनेचा प्रवाह बळकट होईल-कराडमधील सभासद मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सागर दादा पवार यांचे प्रतिपादन_
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
रयत स्वाभिमानी संघटनेचा प्रवाह बळकट होईल.
_कराडमधील सभासद मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सागर दादा पवार यांचे प्रतिपादन_
“गाव तिथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता” या उद्देशानुसार रयत स्वाभिमानी संघटना संपूर्ण राज्यभर सभासद नोंदणी अभियान राबवत आहे. त्याचा प्रारंभ कृष्णा- कोयनेचा प्रीतीसंगम असलेल्या ऐतिहासिक कराडमधून होत असल्याचा मला अभिमान वाटतो. संघटनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करून संघटनेचा प्रवाह बळकट करतील, याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी केले आहे.
जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली कराडच्या विश्रामगृहात झालेल्या जाहीर सभासद मेळाव्यात व पद नियुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष
स्वातीताई माने , जिल्हा सचिव
अभय जाधव, प्रदेश प्रवक्ता तथा जिल्हा कार्याध्यक्ष
आयु. संदीपभाऊ जाधव, जिल्हा सरचिटणीस निहाल इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदनाताई पवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गुंजवटे, युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सपनाताई भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
संघटना हीच माझी ताकद, श्वास आणि विश्वास आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सहकार्यानेच सर्व स्वप्न साकार होतील. समाजसेवेबरोबरच माझा प्रत्येक कार्यकर्ता मोठा व्हावा हाच माझा ध्यास आहे. त्यासाठी प्रत्येकाने रयत स्वाभिमानीचा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकवला पाहिजे, असे सांगून सागरदादा पवार पुढे म्हणाले की, संघटना म्हणजे बारा गावचे आणि वेगवेगळ्या घरातले प्रतिनिधी एकत्र येऊन समाजकार्य करतात, मात्र किरकोळ गैरसमजातून आपापसात मतभेद होऊ देऊ नका. आपण सारे एक आहोत आणि समाजसेवेसाठी एकत्र आलो आहोत. जर फुले एकत्रित असतील तरच त्यांची माळ होते आणि एकत्रित पुष्पहार असेल तरच त्याचे कौतुक होते हे विसरू नये. लवकरच जनता दरबाराचे आयोजन करून गाव गावचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सामाजिक योगदान देणार आहोत तसेच शासकीय कार्यालयातील रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. कामाचा सुरू असलेला झंझावात पाहून काही विघ्नसंतोषी मंडळींकडून चुकीचा प्रचार करून आपणास अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र त्यावर मात करून आपण फिनिक्स भरारी घेत आहोत.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना सुशीलभाऊ कदम म्हणाले की, स्वयंरोजगार मार्गदर्शन, शासकीय योजनांची अंमलबजावणी, युवकांसाठी व्यवसाय निर्मिती व मोठमोठ्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगारांची उपलब्धता करून देण्यासाठी संघटना व्यापक प्रयत्न करत आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, महिला व सरकारी कर्मचारी आदी विविध समाजघटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच संघटनेमार्फत हेल्पलाइन सुरू करत आहोत.
यावेळी जिल्हा संघटक अविनाश दडस, जिल्हा उपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे ,आदित्य चौधरी, शेतकरी आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष, विजय माने आदींचीही भाषणे झाली.या सभासद मेळाव्यास दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विक्रम लावंड, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भोसले, उपाध्यक्ष कार्तिक ढमाळ, सागर पवार, धर्मनाथ लावंड, सौ. सुनीतीताई धायगुडे, सौ. वंदना पवार, सौ. प्रमिला यादव, सौ. शोभा बोराटे, मुमताज शेख, सुवर्णा गाढवे, सपना खंडागळे, सविता अहिरेकर, अनिता कोकरे, मयुरी चव्हाण, प्रज्ञा गायकवाड, आदींसह संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट नियुक्तीपत्र प्रदान या कार्यकर्ता मेळाव्यात दिलीप जगन्नाथ सुतार (उपजिल्हा सरचिटणीस), किरण सावंत (उपजिल्हा संघटक), अनुराधा राजेंद्र जाधव (कराड तालुका सरचिटणीस), सुमन बालिश गाडे (कामगार आघाडी), राणी संतोष दाभाडे (तालुका संघटक), निर्मला संजय पाटील (पाटण तालुकाध्यक्ष), वैशाली विठ्ठल देवकर (महिला आघाडी तालुकाध्यक्ष), नंदा शिवाजी शिंदे (महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष), शीतल राजेंद्र थोरात (कराड तालुका कार्याध्यक्ष), वैशाली आबासाहेब यादव (युवती आघाडी तालुका सरचिटणीस), कमल किरण सावंत (कराड तालुका सचिव), सुजाता पाटील (कराड तालुका युवती संघटक), अनिता धनाजी शिंदे (युवती आघाडी तालुकाध्यक्ष), माया बजरंग मदने (युवती आघाडी तालुका उपाध्यक्ष) या पदाधिकाऱ्यांना सागरदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
आपलाच:- अभय जाधव रयत स्वाभिमानी संघटना सातारा जिल्हा सचिव.