आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी मायणीतील नवी पेठ आजही पारतंत्र्यात!

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी मायणीतील नवी पेठ आजही पारतंत्र्यात!

दि .२६, मायणी प्रतिनिधी : संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मायणी येथील नवी पेठ आजही पारतंत्र्यात असल्याचे चित्र दिसून येते. तसेच मायणी नवी पेठेतील अवस्था पाहता नवी पेठ ही जुनी झालेली पेठ म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असे दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र पाहवयास मिळते.

मायणी येथील नवी पेठ ही तशी ऐतिहासिक पेठ आहे या ठिकाणी गोल घुमुठ ही एक ऐतहासिक वास्तू ही त्याचा पुरावा आहे.परंतु ही जशी जुनी पेठ आहे तशी या पेठेला राजकीय ओळख सुद्धा आहे.ही पेठ माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांचा बालेकिल्ला असल्याचे वेळोवेळीच्या निवडणुकीत दिसून आले आहे त्यामुळे ही पेठ ही माजी आमदार दिलीपराव येळगावकर या गटाची बहुसंख्या असल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले त्यात सुरेंद्र दादा गुदगे यांच्या गटाची सत्ता आली.
सध्या मायणी भागात थोड्या थोड्या प्रमाणात पाऊस चालू आहे या पावसात मायणी ग्रामपंचायतीचे या पेठेकडे असलेले दुर्लक्ष सहज नजर येऊ लागले आहे, यामध्ये पेठेलतील अंतर्गत रस्ते हे चिखल,साचलेले पाणी आणि खड्ड्यांनी भरलेली दिसून येत आहेत सध्या लोकांना चालताही येणार नाही अशी परिस्थिती अंतर्गत रस्त्यांची झालेली आहे. नवी पेठेची लोकसंख्या पाहता या ठिकाणच्या रस्त्यावरून शाळकरी मुले, वयोवृद्ध लोक महिला ये जा करीत असतात परंतु सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी पायही ठेवता येणार नाही किंवा ठेवू वाटणार नाही इतक्या जास्त प्रमाणात खड्डे व घान आहे अश्या वेळी खड्ड्यातून रस्ता शोधात असताना एक प्रकारची कसरत करावी लागतोय. याकडे मायणी ग्रामपंचायत झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष का करत आहे असा सवाल नवे पेठेतील ग्रामस्थ करीत आहेत. तसेच या ठिकाणच्या गटारांची अवस्था पाहिली असता ठीक ठिकाणी गटारे तुंबलेली आहेत यातून मोठी महामारी जन्म घेते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यातून डेंगू, मलेरिया, कॉलरा अशा होणाऱ्या आजारांची भरमसाठ पैदास १५ ऑगस्ट च्या तोंडावर होते की काय अशी भीती तिथं राहणाऱ्या लोकांच्या मनात निर्माण होत आहे यावर लवकरात लवकर मायणी ग्रामपंचायत विभागाने लक्ष घालून ठिकठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम बाळू सूदगरे यांनी वेळोवेळी तोंडी सूचना केल्या होत्या परंतु याकडे ग्रामपंचायत सरपंच यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले यामुळे त्यांनी दि.२५/७रोजी लेखी अर्ज देऊन चोवीस बाय सात नळ पाणी योजनेच्या पाईप पुरण्यासाठी उकारण्यात आलेल्या रस्त्यामुळे झालेल्या नुकसानीची व रस्त्याच्या झालेल्या अवस्थेची जाणीव करून दिली होती आणि तसा संबंधित परिस्थितीवर उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी अर्ज केला आहे. तसेच तुंबलेली गटारी मोकळी होण्यासाठी व सांड पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मायणी ग्रामपंचायतिने लवकरात लवकर लक्ष घालून यावर उपाययोजना करावी अशी मागणी नवी पेठेतील ग्रामस्थ करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button