मायणी:-धोंडेवाडी ग्रामपंचायत सदस्य अपात्र आदेशाची राज्य निवडणूक आयोगाने फेर तपासणीची सूचना.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
धोंडेवाडी ग्रामपंचायत सदस्य अपात्र आदेशाची राज्य निवडणूक आयोगाने फेर तपासणीची सूचना.
मायणी दि: खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर राजकीय मतभेद सुरू झाले. त्याचाच भाग म्हणून ग्राम विकास पॅनलच्या तीन सदस्यांनी सत्ताधारी सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज केले होते. या अर्जावर जिल्हाधिकारी सातारा, विभागीय आयुक्त पुणे यांनी दिलेल्या निकालाचा आदेश रद्द केला.तसेच फेर तपासणी करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा धोंडेवाडी ग्रामपंचायत चर्चेत आलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, धोंडेवाडी ता. खटाव येथे दि.१५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोपीनाथ खोमणे यांची निवड करण्यात आली. दि:७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत विजयी उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर करायचा असे स्पष्ट करण्यात आले. परंतु श्री गोपीनाथ खोमणे यांना या कालावधीत कोरोना साथीचा रोग झाल्यामुळे सुविधा स्पेशलिटी हॉस्पिटल फलटण येथे ते उपचारासाठी दाखल झाले. श्री खोमणे यांचा पदभार इतर कुणाकडे आहे ?त्याचे उत्तर मिळाले नाही. तसेच करोना मुळे सर्व कार्यालय बंद ठेवले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे शक्य झाले नाही.
श्री. खोमणे यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ नये. याची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले होते. करोना झालेल्या व्यक्ती असेल त्यांच्याशी संपर्क होऊ नये असा सर्वच ठिकाणी आदेश असल्याने विहित नमुन्यात व विविध मुदतीत विजयी उमेदवारांना खर्चाचे हिशोब सादर करण्यासाठी तहसील कार्यालय वडूज येथे बॉक्सची व्यवस्था केली होती. त्या बॉक्समध्ये सर्व खर्चाचा तपशील सदस्यांनी टाकला. परंतु, त्याची पोहच देण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. तरी ही हिशोब सादर केला नाही.हे कारण पुढे करून दिड वर्षांनी काही ग्रामपंचायत सदस्यांनी दि: ३० ऑगस्ट २०२२ रोजी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याबाबत त्यांना अपात्र ठरवण्यात यावे असे सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते.
त्यापूर्वी कुठे सदर निवडणुकीच्या अनुषंगाने अपील दाखल करून दाद मागितली नव्हती. याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांनी पुराव्याची खातरजमा न करता नैसर्गिक न्याय तत्त्वांचे उल्लंघन करून लोकशाहीच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात निकाल पारित केला आहे. सोबत तो निकाल रद्दबातल होण्यास पात्र आहे. असे अपिलार्थी यांनी अपील दाखल केले होते. निकाल आल्या नंतर विभागीय आयुक्त, पुणे यांच्या न्यायालयात पुन्हा अपील केले. त्या न्यायालयानेही अपीलार्थी विरोधात निकाल दिला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. राज्य निवडणूक आयोगाने सर्व बाबींची तपासणी व माहिती घेवून निर्णय बाबत सादर करण्यात आलेल्या सर्व कागद पत्रांची फेर तपासणी करण्याची सूचना दि १९ जुलै २०२३ रोजी पत्रा द्वारे केली आहे. त्यामुळे धोंडेवाडी येथील सत्ताधारी सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा लोकशाहीचा विजय असून गावातील थांबलेला विकास पुन्हा गतीने पुढे घेवून जाण्यासाठी संधी मिळाली असल्याचे श्री हणमंत भोसले यांनी सांगितले.
————————————————————
फोटो – धोंडेवाडी ग्रामपंचायत