वाई शहरात पिण्याचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाई :-दि – 27
वाई शहरात पिण्याचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
दि 26 गेली काही दिवसांपासून वाई शहरात पिण्याचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ताप थंडी व घश्याच्या साथीच्या आजाराने ग्रासले आहे नगरपरिषदेने त्यावर काय उपाययोजना केली याबाबत अद्याप खुलासा झाला नाही
सध्या वाई नगरपरिषद कार्यालयात प्रशासन राज आहे प्रशासक वाई शहरासाठी काय करतात नागरिकांच्या आरोग्या बाबत प्रशासन किती जागृत आहे या बाबत खुलासा होणे गरजेचेच आहे नदीला पाणि गढूळ येत आहे याचा अर्थ भर उन्हाळ्यात वाईच्या पश्चिम भागात अर्थपूर्ण पावसाळा सुरु आहे का अशी शंका वाईकरांच्या मनामध्ये येत आहे त्या बाबत प्रशासनाने खुलासा करावा
नदीचे गढूळ पाणी बंद करण्या साठी वाई नगरपालिका काही उपाययोजना करणार असेल तर नक्किच आपली कार्यतत्परतेचा गौरव होईल मा आमदार मकरंद आबा पाटील यांनी वाईकर जनते साठी नेहमीच अनेक सुविधा उपलब्ध केल्या परंतु अकार्यक्षम प्रशासन याबाबत यशस्वी होताना दिसत नाही मा मकरंद आबा पाटील यांनी वाईचा कारभार अधांतरी करणाऱ्या प्रशासनाला योग्य सुचना देउन वाई शहराला होणार्या गढूळ पाणीपुरवठ्या पासून वाचवावे व नागरीकांच्या आरोग्या बाबत सजग भूमिका घ्यावी अशी मागणी वाईतील जनतेने केली आहे.