खटाव:-मायणी परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, बळीराजा हातबल.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
मायणी परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, बळीराजा हातबल.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यात विशेषतः मायणी परिसरात वरून राजाने दडी मारल्याने या परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा पूर्णपणे हात बल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उन्हाळ्यात वळीव स्वरूपाचा पाऊस झाला नाही जून महिन्याच्या प्रारंभी मान्सूनपूर्व पाऊस केवळ 40 मिनिटे झाला आहे सध्या या परिसरात 93 मिलिमीटर पाऊस झाला असून या पावसावर शेतकऱ्यांनी मशागती करून पेरण्या केल्या आहेत वास्तविक या मंडलात बाराशे हेक्टर जमिनीवर खरीप हंगामाची पिके घेतात पण सध्या 671 वर पेर झाला आहे अनेकांनी पेरणी केली आहे व त्यांचा पेर उगवला असून आता या परिस्थितीत हा पेर टिकाव धरू शकतो किंवा काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तसेच अनेकांनी फन पाळी देऊन ठेवलेली आहे पण पेर केला नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे टेंभू योजना, तारळी या योजनेतून अनेक विभागाला पाणी मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागण केली. परंतु सध्या विहिरी पूर्णपणे आपले संपलेअसून उसाचे पाचट तयार होऊ लागले आहे तसेच आता जनावराला काय चारा द्यायचा हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे त्याचप्रमाणे ज्यांनी शेतात पेर केलेला आहे त्यांचे काय व ज्यांनी अद्याप पेर केला नाही. त्यांचे काय अशा परिस्थितीत शासनामार्फत काय करावे यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंडल अधिकारी एम एन जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली