सातारा :-समाधान कारक पाऊस होईपर्यंत नेर तलावातील पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा :-समाधान कारक पाऊस होईपर्यंत नेर तलावातील पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय.
सातारा दि: दुष्काळी खटाव तालुक्यात समाधानकारक पाऊस होईपर्यंत खटाव तालुक्यातील काही भागात पाणी सोडण्याचा निर्णय आज झालेल्या सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील बैठकीत घेण्यात आला. सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला होता .त्यामुळे तलावातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती. याची जाणीव ठेवून आमदार जयकुमार गोरे यांनी समाधानकारक पाऊस होईपर्यंत नेर तलावातून शेतीला पाणी सोडावे . अशी सूचना केली आहे.
पाण्याची कमतरता भासणार नाही.परंतु, पाणी पुरवठा करताना अडचणी येवू नये यासाठी आवश्यक वाटल्यास जिहे कठापुर योजनेतील पाणी नेर तलावात सोडून पुढे ते खटाव तालुक्यातील काही भागात सोडण्यात येईल. असाही सांगण्यात आले. त्यामुळे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नेर तलाव हे खऱ्या अर्थाने खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी उपयुक्त ठरू लागला आहे.
सदरच्या नेर तलावातून काही महिन्यांपूर्वी पिण्याचे पाणी योजना कार्यान्वित झाली असून त्याचा लाभ पुसेगाव, फडतरवाडी, नेर, विसापूर, ललगुण, डिस्कळ बुध, पवारवाडी या गावांना होत आहे. नेर धरणाची क्षमता ११.७९ दशलक्ष घनमीटर आहे .सध्या या तलावात २७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे किमान १५ टक्के पर्यंत पाणीसाठा शिल्लक राहावा. असे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जिहे कटापूर योजनेतूनही आवश्यक वाटल्यास नेर तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजी करू नये. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. कोणतीही अडचण पिण्याच्या पाण्यासाठी येऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.
या बैठकीला आमदार जयकुमार गोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वरूण मोटे, उपअभियंता विकास बनसोडे व शेतकरी तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान, माण -खटाव विधानसभा मतदारसंघातील गावांना नेर तलावाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार गोरे यांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. जोपर्यंत समाधानकारक पाऊस खटाव तालुक्यात पडत नाही तोपर्यंत शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. या निर्णयाचे माण खटावचे भाजप कार्यकर्ते धनंजय चव्हाण, आकाश जाधव व अरुण गोरे, माण भाजप तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, खटाव महिला तालुका अध्यक्ष सौ. वृक्षाली रोमण व रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडाकुश व मान्यवरांनी धन्यवाद दिले आहेत.
छाया_ नेर तलावातील पाणीसाठा