मुंबई:-मुंबईतील न झालेले शिवस्मारक बनले राज्यकर्त्यांचे अदृश्य थडगे ?
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
मुंबईतील न झालेले शिवस्मारक बनले राज्यकर्त्यांचे अदृश्य थडगे ?
मुंबई दि: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन अनेकांनी राज्यात सत्ता भोगली व भोगत आहे परंतु सात वर्षाचा कार्यकाळ होऊन सुद्धा अद्यापही मुंबई येथील अरबी समुद्रा नजीक गिरगाव चौपाटीवर अद्याप शिवस्मारक उभे राहिले नाही त्यामुळे त्या ठिकाणी राज्यकर्त्यांचे अदृश्य थडगे दिसत असल्याचा भास शिवप्रेमींना होऊ लागला आहे. अशी चर्चा होताना दिसत आहे.दरम्यान शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व धाडसी नेते दिवंगत विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त या न झालेल्या शिवस्मारकाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
भावनिक दृष्ट्या राजकारण करून लोकांची दिशाभूल करणे. हे सध्या राज्यकर्त्यांचे ठळक वैशिष्ट्य ठरलेले आहे. न केलेल्या कामाचे कुणीही श्रेय घेत नाही. परंतु, झालेल्या कामाबाबत आपणच काम केले असा आभास निर्माण केला जात आहे. त्याला काही प्रसारमाध्यमही जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत. दि:२४ डिसेंबर २०१६ साली रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गिरगाव चौपाटीवर शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळेला २०२१ रोजी हे काम पूर्ण होईल .असे छातीठोकपणाने सांगण्यात आले. सध्या ते राज्य सरकार कोसळले असून त्याच्याच पोटातून जन्म घेतलेले दुसरे सरकार आता अस्तित्वात आहे पण त्यांनाही वर्षपूर्ती बाबत आनंद उत्सव साजरा करण्यामध्येच घाई निर्माण झालेली आहे .याची आता अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
सदर शिव स्मारकाबाबत करारानुसार दि: २८ ऑक्टोबर २०१९ रोजी स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु तीन जनहित याचिकांमुळे न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली आहे. तर दोन वर्षाचा काळ कोरोना संकट आणि गेल्यामुळे त्याकडे कोणाचे लक्ष लागले नाही. प्रकल्पाच्या कामकाजाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सुकाणू समिती, प्रकल्प सह नियंत्रण व अंमलबजावणी समिती, कार्यकारी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शिवस्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. यासाठी दि:२८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून दि: २८ जानेवारी २०१८ रोजी जागतिक दर्जाची कंपनी लार्सन अँड टुब्रो यांना हे काम देण्यात आले होते. या कामाचा कार्यादेश दिनांक १९ ऑगस्ट २०१८ रोजी पारित करण्यात आला होता. तसेच या कामाला सुरुवात न होताच एक वर्षाची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती.
वास्तविक पाहता अरबी समुद्रात १६८६ हेक्टर क्षेत्रफळाच्या खडकावर हे शिव स्मारक उभे करण्याचा संकल्प केला होता .गिरगाव चौपाटीपासून ३.७ किलोमीटर परिसरात या स्मारकाभोवती तटरक्षक भिंती तसेच तुळजाभवानी मंदिर व सदर स्मारकांमध्ये मंदिर संग्रहालय, रुग्णालय ,रायगड किल्ल्याचे प्रवेशद्वाराची प्रतिकृती व छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनपट असा एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्चाचा हा शिवस्मारक उभारण्याचे निश्चित केले होते .परंतु, अद्यापही या शिवस्मारकाला एकही वीट लागलेली नाही. हा नैतिक पराभव सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचा असून त्यांनी आता याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
देशात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज,डॉ .बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व अनेक युगपुरुषांची नावे घेऊन मताचा जोगवा मागितला जातो. पण प्रत्यक्षात शिवस्मारक सुद्धा झालेले नाही व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इंदु मिल जागेत सुद्धा स्मारक झाले नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. याबाबत आता जनतेने आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारावा अशी मागणी पुढे आलेली आहे.
________________________________________
फोटो _ नियोजित छत्रपती शिवस्मारकाचे चित्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेल चित्र