खटाव:-विकासाचा उंबरठा श्री प्रभाकर घार्गेसाहेब – अजित जगताप,सातारा
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
विकासाचा उंबरठा श्री प्रभाकर घार्गेसाहेब
– अजित जगताप,सातारा
माणसाचे कर्तव्य हे त्यांच्या गुणावर अवलंबून असते. त्यामुळे आपले गुण चांगले असले की शत्रुत्व कमी करण्यास मदत होते. त्या अर्थाने पाहिले तर खटाव तालुक्यातील पळशी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संयमी नेतृत्व अशी आपली ओळख निर्माण करणारे आदरणीय प्रभाकर घार्गेसाहेब यांचा दिनांक 18 सप्टेंबर हा वाढदिवस आहे.
या वाढदिवसानिमित्त खरं म्हणजे जाहिराती या ओघाने आल्या. परंतु त्याच्यावर नितांत प्रेम करणारे सर्वसामान्य वाचक वर्ग तसेच त्यांनी खूप मोठे व्हावे. अशी इच्छा असणारे माण- खटावच्या मातीतील कार्यकर्त्यांची फौज ही एका तपात निर्माण झालेली नाही. त्यासाठी मायेचा ओलावा निर्माण करणारे आदरणीय प्रभाकर घार्गेसाहेब यांची कर्तबगारी सुद्धा तेवढीच तोला मोलाची आहे.
पळशी सारख्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर अलीकडच्या काळात शेतकरी कुटुंबावर होणारे आघात त्यांनी सुद्धा सहन केले. मुळातच दुष्काळी खटाव तालुक्यातील आपला जन्म झालेला आहे. तो कर्तबदारी दाखवण्यासाठीच ही त्यांनी चाणक्य पणाने ओळखले. बीएससी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शासकीय सेवेत जाऊन आरामदायक जीवन जगण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करावे. यासाठी त्यांनी व्यवसायाची स्वप्न पाहिली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट- परिश्रम व जिद्द मनाशी बाळगून त्यांनी आपल्या व्यवसायाशी निगडित अनेक उद्योग केले.
अपयश ही यशाची पहिली पायरी याची खरी ओळख त्यांना १९८४ साली औंध येथे साबण फॅक्टरी काढल्यानंतर त् समजली .त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी जसा श्रीराम यांचा वनवास संपतो. तशा पद्धतीने त्यांचा व्यवसायातील वनवास संपून १९९८ पासून त्यांनी ट्रॅक्टर एजन्सी व बांधकाम व्यवसायासोबतच जमीन- खरेदी विक्रीच्या व्यवसायातून आपला नावलौकिक प्राप्त केले.
खटाव तालुक्याचे भाग्यविधाते कैवारी माजी आमदार केशवराव पाटील यांचे जावई अशी ओळख त्यांची निर्माण झाली असली तरी स्वकर्तबगारीने स्वतःची ओळख निर्माण केली . आपल्या मुलींना सुद्धा त्यांनी उद्योग व्यवसायात समर्थ साथ दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांचा विजय व्हावा. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली .अशीच एकजुटीची आता आगामी माण खटावच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच खऱ्या अर्थाने और एक धक्का और दो… अशी म्हणण्याची वेळ आता त्यांच्या समर्थक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आलेली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांना सुद्धा चेअरमन पदाची माळ मिळाली असती परंतु त्यांनी संचालक म्हणून खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी ग्रीन हाऊस उभारणी, फळबाग लागवड, वाहन खरेदी, शेतकरी निवास, कुक्कुटपालन ,डेरी उद्योग, जमीन सपाटीकरण अशा विविध माध्यमातून तारण व कारण पाहूनच कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे खटाव तालुक्यातील १०३ विकास सेवा सोसायटी माध्यमातून सुमारे एक हजार कोटीचे कर्ज वाटप करण्यात त्यांना यश मिळालेले आहे.
सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानण्याचे जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्य सैनिक किसनवीर आबा यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आज सुद्धा सामान्यांच्या कुटुंबाशी नाळ जोडलेली आहे. माण खटाव तालुक्यातील दुष्काळ नष्ट करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात अभ्यासपूर्व मांडणी करून विकासात्मक आवाज उठवलेला आहे. तो कधी विसरता येणार नाही.
शंभर किंवा पाचशेची नोट जमिनीवर टाकली तर तिचा आवाज येत नाही. परंतु ,चिल्लर पैसे टाकल्यानंतर त्याचा आवाज फारच घुमतो. तशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात आता राजकारणातील चिल्लर लोकांचा आवाज घुमत आहे. आजही त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी १९९९ मध्ये मानाजी बाबा विद्यालय स्थापन केले आणि गेले अनेक वर्षे हे विद्यालय गुणवत्ता टिकवून आहे. त्याचबरोबर सातारा पॉलिटेक्निक ,अनंत इंग्लिश स्कूल, डी फार्मसी, महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेल्या कटगुण येथील आश्रम शाळा असे विविध माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.
मुक्या जनावरांसाठी वीस-बावीस वर्षांपूर्वी त्यांनी चारा छावण्या उभ्या करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेहोते .यासाठी कोट्यावधी रुपयाची त्यांच्या उद्योजक मित्रांनी व सामाजिक संस्था आणि व्यक्तिगत तसेच जिल्हा बँकेने सहकार्य केले. हे आजही शेतकरी वर्ग विसरू शकत नाही.
खटाव तालुक्यातील पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सेवा सोसायटी, ग्रामपंचायती व अनेक सांस्कृतिक व सामाजिक मंडळांना मदत करण्यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे. विधानपरिषदेवर संधी मिळाल्यानंतर त्यांनी दुष्काळी भागासाठी निधी उपलब्ध करून देताना संयमी नेतृत्वाची चुणूक दाखवली. खाजगी साखर कारखानदारी उभी करून विविध निर्मिती करणारे प्लांट व महत्वकांक्षी योजना सुद्धा कार्यान्वित केल्या आहेत. त्यामध्ये त्यांचे सहकारी यशस्वी ठरलेले आहेत. आज त्यांचे स्वीय सहाय्यक श्री वसंत पोफळे व वैभव पवार आणि अन्य सहकारी श्री घार्गेसाहेबांसाठी परिश्रम घेत आहेत.
सध्या खटाव तालुक्यातील साडेदहा हजार व माण तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस त्यांनी उभ्या केलेल्या पडळ येथील साखर कारखान्यामध्ये गाळप होत आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊसाला दर मिळत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत माण खटावच्या मातीतील या सुपुत्राला खऱ्या अर्थाने विजयासाठी लागणारे सर्व गोष्टी आज शिवारात पसरले आहेत. त्याची एक मोट बांधण्याची गरज निर्माण झालेली आहे. परंतु दुर्दैवाने तसे काही घडणार नाही. कारण, आज पाण्यात राहून माशाशी वैर करणे. म्हणजेच राजकारण असे अनेकांना वाटत असल्यामुळे इच्छा असूनही माण खटाव मध्ये परिवर्तनाची क्रांती घडू शकत नाही. हे त्रिवार सत्य स्वीकारावेच लागत आहे. यामध्ये बदल व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करून आदरणीय प्रभाकर घार्गे साहेब यांना माण खटावच्या सुज्ञ मतदारांनी संधी देऊन आपले स्वप्न साकार करावे. अशा सदिच्छा व्यक्त करून त्यांना दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडत असताना ज्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. अशा सर्वांचे भले व्हावे. अशी सदिच्छा व्यक्त करतो.