सातारा:-सातारा जिल्ह्यात बियाणे व खत तयार पण ,शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यात बियाणे व खत तयार पण ,शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.
सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून३८ हजार १३७ क्विंटल बियाणे व ६१ हजार७४८ मॅट्रिक टन खत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे .अद्यापही गतवर्षाच्या मानाने पेरणी झाली नाही त्यामुळे खरीप हंगामा पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी तीन लाख ९७ हजार ६८ हेक्टर पेरणी पैकी गतवर्षी तीन लाख ७५ हजार हेक्टर पेरणी झाली होती. त्यामानाने यंदाच्या वर्षी दोन टक्के सुद्धा पेरणी झालेली नाही. सध्या ४२.२० एम. एम. पाऊस झाला असून पेरणीसाठी उपयुक्त पाऊस हा ७५ एम.एम. झाल्याशिवाय समाधानकारक पेरणी करता येत नाही. किमान जमिनीच्या खाली चार इंच पाणी मुरणे गरजेचे आहे. त्यामुळे ओलावा निर्माण झाल्यानंतर बियाणे उगवण्याची क्षमता वाढते अशी माहिती सातारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी व्ही एस माईणकर यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी 22२२ जून रोजी ९४.३९ टक्के पेरणी झाली होती. यंदाचा पाऊस लांबला आहे. तरीही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 870८७० मेट्रिक टन युरिया व ६२१ मेट्रिक टन खतांचा सुरक्षित साठा करण्यात आलेला आहे. जमिनीत पुरेशी चार ते पाच इंच ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यापूर्वी घरच्या घरी उगवण क्षमता चाचणी घेणे आवश्यक आहे. बियाणांच्या पिशव्यांमध्ये मूठभर बियाणे व टॅग जपून ठेवावा. तसेच बियाणाची पक्की पावती घ्यावी. नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.
सातारा जिल्ह्यात बियाणं बाबत काही तक्रारी असेल तर तक्रार समिती स्थापन करण्यात आले असून त्याबाबत पक्क्या पावती आवश्यक आहे. मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, सोयाबीन व भात लागण्यासाठी पंधरा ते वीस जुलै पर्यंत कालावधी आहे.या वेळेत पेरणी करता येईल. असेही स्पष्ट केले आहे.
यंदाच्या वर्षी अनेकांनी जमिनीची व शेताची मशागत केलेली आहे. तसेच बी बियाणे व खताचे तयारी केली आहे. दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात पशुधन होते. त्यामुळे शेणखत व इतर अवजारे उपलब्ध होत होती. अलीकडच्या काळात बैलगाडी व बैल जोडी तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे सध्या आधुनिक पद्धतीने पेरणी होत आहे. पूर्वी वारंगुळा व शेतकरी मशागत करत होते. अलीकडच्या काळामध्ये शेती उद्योग व शेतमजुरांकडे काम उरले नाही. असेच चित्र दिसत आहे. कारण आता आधुनिक यंत्रणा द्वारे पेरणी होत असून शेत जमिनीची वाटणी झाल्यामुळे पहिल्यासारखी शिवारात लगबग दिसून येत नाही. अशी खंत शेतकरी वर्ग करू लागले आहेत .पूर्वी दहा ते पंधरा एकर बागायतदार शेतकरी शेतीवर अवलंबून होते आता शेतीची वाटणी झाल्यामुळे दोन ते तीन एकर किंवा अगदी अर्धा एकर क्षेत्र वाटणीला आल्यामुळे शेती करताना शेतकऱ्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पूर्वी घरातील सर्व कुटुंब हे शेतीत रमत होते .अलीकडे शेती वाट्याने देण्याचे प्रमाण सुद्धा वाढले असल्याने शिवारात पूर्वीसारखी पेरणीची लगबग होताना दिसत नाही. त्यामुळे उशिरा होत असलेली पेरणी सुद्धा बघण्यासाठी एक वेगळीच मजा येणार आहे.
छाया- पूर्वी शेतीमध्ये कुटुंब राबवत होते आता पावसाच्या प्रतीक्षात असलेले शेतकरी( छाया- निनाद जगताप, सायगाव)