पनवेल:-स्वराज स्टोनप्रकरणी सीबीआयकडे दाद मागणार.
पत्रकार कुंदा भोपी कामोठे:-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी कामोठे
स्वराज स्टोनप्रकरणी सीबीआयकडे दाद मागणार.
राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री यांचीही भेट घेणार; बडे मासे अडकण्याचा दावा.
पनवेल: स्वराज स्टोन प्रकरणातील गुंत्ता अधिक वाढत चालला आहे. एका संचालकाचा राजीनामा आणि कंपनी बंद केल्याचा बनाव रचून दिशाभूल सुरु आहे. याप्रकरणी अडकलेल्या बड्या आर्थिक भांडवलदारांचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीने हा बनाव रचला असल्याचे सांगत याप्रकरणात लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मार्मु आणि केंद्रिय गृहमंत्री अमितभाई शहा यांची भेट घेवू तसेच सीबीआयकडे पुराव्यांसह तक्रार करणार असल्याची माहिती पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वराज आणि नवी मुंबई विमानतळ हे आर्थिक समीकरण आहे. त्या अनुषंगाने विमानतळ आणि तत्पूर्वी जे काही दगडखाणीतून उत्खन्नन केले आहे, त्यात तीन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल बुडवून महाघोटाळा केला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, २७ गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी स्वराजविषयी पुढील आंदोलनाची दिशा पनवेल शासकीय विश्रामगृहात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदींच्या तोंडाला कुलूप कुणी लावले?
स्वराजप्रकरणी स्थानिक, प्रकल्पग्रस्तांची आर्थिक लुबाडणूक सुरु आहे. सरकारचा तीन ते चार हजार कोटींचा महसूल बुडविला जात आहे. ही सरकारी तिजोरीची लुट होताना सामाजिक भान हरपलेले आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी तोंडाला कुलूप लावून गप्प का बसले आहेत, याचा खुलासा करावा असे सांगत कांतीलाल कडू यांनी, स्वराजमध्ये त्यांचा आर्थिक वाटा किती याविषयी खुलासा करावा तसेच जनतेशी द्रोह केल्याप्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली.
लालू प्रसाद यादवांना धर्मात्मा मानत,
त्यांनाही कारावास भोगावा लागला!
एकीकडे समाजाची, सरकारी मालमत्तेची प्रचंड लूट करायची आणि दुसरीकडे दान देत असल्याचे सोहळे घडवून आणायचे ही युक्ती सत्तेच्या माध्यमातून बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी केली. त्याच लालूंच्या पावलावर पाऊल टाकत इथले काही लालूही एक दिवस कारागृहात जाणार आहेत, असे कांतीलाल कडू यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगताना, हिंदी सिनेमातील, पाप करे इन्सान अगर तो वो पापी कहलाता है, तुने भी तो पाप किया है फिर कैसे कहूं तू दाता है या ओळी ऐकवून बोगस धर्मात्मा एक दिवस कारागृहात जातील असा प्रचंड आत्मविश्वास नामोल्लेख टाळत यानिमित्ताने व्यक्त केला.
कोकण आयुक्तांचा “सत्रे” होणार !
सद्या काही उद्योजकांवर नवी मुंबईत सीबीआयचे धाडसत्र सुरू आहे. त्यांना पदावर असताना तत्कालीन कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी मदत केली होती. त्यामुळे निवृत्तीनंतर सत्रे त्यांच्या मीठाला जागत त्यांच्याकडे नोकरी करीत आहेत. सध्याचे कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वराजने महसूल प्रकरणात केलेल्या घोटाळ्याविषयी मौन बाळगल्याने त्यांच्यावरही संशयाची सुई फिरत आहे. याप्रकरणात स्वराजला त्यांनी पाठीशी घातल्यास त्यांचाही एक दिवस सत्रे होईल, असा दावा कांतीलाल कडू यांनी केला.
प्रशांत पाटील यांनी डागली
अतुल भगत यांच्यावर तोफ
स्थानिक, प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही प्रांजळपणे पुढे आलेलो असताना कान्होबा दगडखाण संघटना स्वराजच्या मदतीने आम्हाला लक्ष्य करीत असेल तर या सुपारीबाजांनी आत्मपरीक्षण करायला हवे असे सांगून अतुल भगत यांच्याविषयी गुन्हेगारी आणि इतर तपशील उघड करुन जबरदस्त हल्ला चढविला.
अनेक वर्तमानपत्रांची कात्रणे पुराव्यासाठी दाखवत प्रशांत पाटील यांनी भगत यांच्यावर व्यक्तिगत शाब्दिक हल्ला चढवून जशास तसे उत्तर दिले.
स्थानिक, प्रकल्पग्रस्त प्रशांत
पाटील, कांतीलाल कडू यांच्यासोबत
स्वराजच्या महाघोटाळ्याला वाचा फोडून प्रशांत पाटील, कांतीलाल कडू यांनी स्थानिक, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेत अंगावर वादळ घेतले आहे. स्थानिकांसाठी ते लढत असल्याने २७ गावातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी आणि सदस्य सचिन केणी यांनी सांगितले.
तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करुन २४ जूनपासून स्वराजविरोधात जनआंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी घोषित केले.