चाळीसगाव:-(वाघडू)-पोस्ट ऑफिस मध्ये तत्कालीन पोस्टमन तुषार बाजीराव पाटील यांच्या सेवा काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार…..
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वाघडू ता. चाळीसगाव येथील पोस्ट ऑफिस मध्ये तत्कालीन पोस्टमन तुषार बाजीराव पाटील यांच्या सेवा काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार…..
वाकडी ता.चाळीसगाव येथील पोस्ट ग्राहक गोरख नगराज पाटील यांनी वेळोवेळी त्यांच्या पोस्ट खात्यात जमा केलेली रक्कम तत्कालीन पोस्टमन तुषार पाटील यांनी पोस्ट खात्यात जमा न करता , ती रक्कम स्वतःकडेच ठेवली कारण या रकमांचा तपशील ऑनलाईन काढलेल्या स्टेटमेंट मध्ये दिसून येत नाही. पोस्ट ग्राहक गोरख पाटील यांचे पोस्ट पासबुक व आज रोजी त्यांनी ऑनलाईन काढलेले पोस्ट खाते स्टेटमेंट यात जमा रकमांची भयानक तफावत आहे. वाकडी येथील पोस्ट ग्राहक गोरख नगराज पाटील यांची केली दिशाभूल व आर्थिक फसवणूक. गोरख नगराज पाटील यांचे वाघडू ता. चाळीसगाव पोस्ट ऑफिस मध्ये 7 जानेवारी 2016 पासून बचत खाते आहे. त्यांनी त्यांच्या बचत खात्यात अनेकदा पैसे टाकले व काढले देखील. गोरख पाटील यांनी 14 /11 / 2018 रोजी 5000/- (पाच हजार रुपये )जमा केले , दिनांक 12/ 2 /2021 रोजी 10000/- (दहा हजार रुपये ) जमा केले , 17 / 3 /2021 रोजी 10000/-( दहा हजार रुपये ) जमा केले 27 /4 /2021 रोजी 10000/-( दहा हजार रुपये )जमा केले. हे संपूर्ण रक्कम स्वतःकडेच ठेवली. पाटील यांच्या पोस्ट खात्यात जमा केली नाही. या जमा केलेल्या रकमे शेजारी पोस्टाचा गोल शिक्का व तुषार पाटील यांची सही आहे. यांच्या या बेजबाबदारपणामुळे गोरख पाटील यांचे पोस्ट खाते dormant झाले. दरवर्षी व वेळोवेळी पैशांचे transaction करूनही पोस्ट खाते dormant झालेच कसे? 15 /9 /2021रोजी पोस्ट ग्राहक गोरख पाटील यांच्या पोस्ट खात्यात पाच हजार सहाशे रुपये होते व आहेत. परंतु आज रोजी निवळ 728 रुपये बॅलन्स दिसत आहे.5600-728=4872 व त्यावरील दोन वर्षाचे व्याज एवढी रक्कम पोस्ट खात्यात जमा असणे अपेक्षित आहे. परंतु आज रोजी गोरख पाटील यांच्या पोस्ट खात्यात फक्त 728 रुपये शिल्लक आहे. याला योगायोग म्हणावा की हेतू पुरस्कर केलेला भ्रष्टाचार? दररोज सायंकाळी पोस्ट व बँकेत बॅलन्स टॅली केला जातो ? या ठिकाणी एवढी तफावत कशी ? या प्रकरणाची निःपक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी व चौकशी चौकशीअखेर निष्पन्न दोषी विरोधात कायद्यानुसार कारवाई करावी ,अशी मागणी गोरख पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.