खटाव तालुक्यात मोठ्या उत्साहात तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव तालुक्यात मोठ्या उत्साहात
तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी,,,,
खटाव दि: महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सत्य, अहिंसा व तपस्या यावरील आधारित बुद्ध धम्माची स्थापना केली. त्या भगवान गौतम बुद्धांच्या २५८५ व्या जयंतीनिमित्त खटाव तालुक्यात सर्व जाती धर्मातील बंधू भगिनींनी एकमेकांना शुभेच्छा देऊन बुद्ध जयंती साजरी केली.
खटाव तालुक्यातील पिंगळी, हिंगणे, खटाव, वरुड डिस्कळ, होळीचा गाव, पुसेगाव, कुमठे, कलेढोण, निढळ, मायणी, विसापूर, वडी, गोपुज, गुरसाळे,
चितळी राजाचे कुर्ल ,सिद्धेश्वर कुरोली, वडूज, नेर, वर्धनगड, मोळ, कान्हर वाडी आधी गावातील समाज मंदिर व बुद्ध विहारांमध्ये सामुदायिक त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले .
भगवान गौतम बुद्ध यांनी कधी देवता व काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. त्याचे अनुकरण व्हावे. यासाठी द बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, त्रिलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण व विविध गावातील तरुण मंडळ विकास मंडळ कार्यरत आहे. भगवान गौतम बुद्धांचे प्रथम गुरु आलर कलाम यांचे यावेळी स्मरण करण्यात आले.
यावेळी बोलताना अजित जगताप म्हणाले, भगवान गौतम बुद्धांनी २९ व्या वर्षी राजवाड्याचा त्याग केला. त्यानंतर वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमे दिवशी पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ होऊन त्यांनी बुद्धत्व प्राप्त केले. बुद्ध हे कुणाचे अवतारी नव्हते आणि अवतारी राहणार नाहीत. काही खोडसाळ वृत्ती बुद्ध हे अवतार आहे. असा अपप्रचार करत आहेत. त्याला अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सडेतोड उत्तर दिले.
सौ. मायावती गायकवाड म्हणाल्या, भगवान गौतम बुद्धांची आई महामाया यांनी त्यांना जन्म दिला. पण त्यांचे पालन पोषण मावशी महाप्रजापती यांनी केले. त्यामुळे आई व मावशी या अनेक कुटुंबातील माया देणाऱ्या व्यक्ती ठरलेले आहेत. भगवान गौतम बुद्धांचे विचार त्रिकाल कायम राहतील.यावेळी विविध सामाजिक संघटना तसेच रिपब्लिकन पक्षाचे विविध गटातील नेते व कार्यकर्ते तसेच बी. पी. वाघमारे, सिद्धार्थ सोनवणे, प्रकाश कांबळे, श्रीमती मसणे सागर भिलारे, गौतम रनबागले, डॉ प्रल्हाद इंजे, सौ नलवडे, विक्रम डोइफोडे, गणेश भोसले, संतोष भंडारे, विशाल कदम, अजिंक्य वाघमारे, महादेव बनसोडे, विजय कांबळे तसेच वडूज नगरीचे नगरसेवक नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ते यांनी बौद्ध बांधवांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक अनिल माळी, नगरसेविका सौ. स्वप्नाली गोडसे, दत्ता केंगारे, विलास कांबळे, अजित पाटेकर, डॉ वैभव माने, उमा झेंडे, अशोक बैले, अजित नलावडे , तुषार बैले, राहुल दाऊद खान मुल्ला, अशोक सर्वगोड, बी. आर. जगताप, सत्यवान कमाने , काका बनसोडे, शैलेश वाघमारे, श्रीमती नीता भागवत, प्रा. राजकुमार गायकवाड, महादेव सकट, प्रा. हणमंत डावरे, सुधाकर शिलवंत, बौद्धाचार्य रणदिवे, सुरेश कंठे, संदीप झेंडे, धनराज आवळे, विशाल कदम, आनंदा साठे, प्रकाश मिसाळ, संजय खुडे, गणेश गोडसे, विक्रम रोमन, डॉ. महेश गुरव ,धनंजय चव्हाण, परेश जाधव, विजयकुमार शिंदे, गणेश चव्हाण, योगेश जाधव, आनंदा जगदाळे, विजय शेटे तसेच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
भगवान गौतम बुद्धांच्या सत्य अहिंसा व तपस्या यावर आधारित विविध कार्यक्रम करण्यात आले. यावेळी युगपरुष यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली. स पो नि दत्तात्रय दराडे, पो. उप नि. शितल पालेकर, होमगार्ड, पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाला खटाव तालुक्यातील स्थानिक महिला मंडळ, तरुण मंडळ व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध गुण गौरव दर्शन मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सर्वधर्मसमभावाची शिकवण देऊन संपूर्ण खटाव तालुक्यात बुद्ध जयंती साजरी झाली आहे. अनेक कुटुंबीयांनी आपल्या घरामध्ये भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. काही ठिकाणी खीर वाटप करण्यात आली.
—–&———————————————————
फोटो – बुद्ध जयंती निमित्त त्रीसरण व पंचशील गाथा ग्रहण करताना मान्यवर (छाया – उमेश जगताप,)