सातारा:-स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी दि: १२ मार्च रोजी कराड ते सातारा लॉग मार्च- सुशांत मोरे यांचा इशारा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी दि: १२ मार्च रोजी कराड ते सातारा लॉग मार्च- सुशांत मोरे यांचा इशारा.
सातारा दि: राज्यकर्त्यांच्या बगलबच्चांना रोजगार हमी योजना चा लाभ मिळावा म्हणूनच महायुती शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे. महावितरण कंपनीने पुन्हा ही जमीन खासगी ठेकेदाराला भाडेपट्टयाने दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी तसेच प्रकल्प रद्द करावा, ग्रामपंचतला गायरान जमिनी परत करा, मागणी साठी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांचे समाधी स्थळापासून म्हणजे दि.१२ मार्चपासून आंदोलन सुरु करण्यात येणार असून सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवतीर्थ पोवई नाका येथे येऊन शिवछत्रपतींच्या चरणी आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकाराचे तसेच पर्यावरण प्रेमी सुशांत मोरे यांनी सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पासाठी गायरान जमीन खासगी ठेकेदाराला नाममात्र १ रुपये भाड्याने देणे हे वाजवी भाडे नाही, त्यामुळे सरकारला प्रचंड आर्थिक तोटा होणार आहे. एकीकडे शासन महसूली उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणार असल्याचे सांगते आणि दुसरीकडे जिथून महसूली उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे. गायरान जमीन ही सर्वसामान्य लोकांच्या आणि सार्वजनिक उपयोगासाठी असते. या जमिनी खासगी ठेकेदाराला अत्यल्प भाड्याने देणे हे सार्वजनिक हिताविरोधात आहे. गोरेगाव वांगी तालुका खटाव येथील गायरान जमिनीवर ४० वर्षापासून झाडे व बंधारे आहेत असे असताना तेथील जागेवरील झाडे तोडण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे पर्यावरण समतोल राखला जाणार नाही. सातारा जिल्हयातील एकूण १३०० एकर जमिनींचे दस्त भाडेपट्टा रजिस्टर होऊन सदरची जागा ही महानिर्मिती प्रकल्पासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. या कंपनीशी महानिर्मिती कंपनीने १७ मे २०२४ रोजी करार केलेला आहे.
या करारानुसार सातारा जिल्हयात एकूण १३२३ एकर जमीन आजअखेर जिल्हाधिकारी सातारा यांनी महावितरण कंपनीला दिली आहे. त्यापैकी फक्त ५९ ठिकाणी प्रोजेक्टच काम सुरु झाले आहे. करारात दोन वर्षांची मुदत असून ती संपण्यास ६ महिने राहिले आहेत . उर्वरित ठिकाणी प्रोजेक्ट उभे राहणार का ? असा सवाल श्री मोरे यानी उपस्थित केला आहे. या मागे भाजपचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक व उद्योजक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या कंपन्या कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्याद्वारे चौकशी समिती गठीत करून जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि सदरचा प्रकल्प रद्द करावा अशीही मागणी श्री. मोरे यांनी केली. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांचा मुळावर उठणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे जनहिताच्या या आंदोलनात महाराष्ट्रातील व सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांनी उतरावे, असे आवाहन सुशांत मोरे यांनी केले. या पत्रकार परिषदेला सातारा जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नाबाबत न्याय देण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी व या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
__________________________________________
फोटो सातारा पत्रकार भवन मध्ये पत्रकारांश संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे
(छाया- निनाद जगताप सातारा)