औरंगाबादः-3 महीन्यापुर्वी प्रेम विवाह झालेल्या तरूणीची गळफास घेवुन आत्महत्या.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादः 3 महिन्यापुर्वी प्रेम विवाह केलेल्या बजाजनगर येथील 21 वर्षीय तरूणीची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.30 जानेवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकिस आली.अंजली रोहीत आव्हाड वय21 रा.बजाजनगर असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे.अंजली चा प्रेम विवाह 9 नोव्हेबंर 2022 रोजी रोहीत कारभारी आव्हाड वय 22 रा.बजाजनगर या तरूणा सोबत झाला होता.सासर कडील मंडळी कडुन त्रास दिला जात असल्याने शनिवारी या विषयाची तक्रार करण्यासाठी अंजली वाळुज एम आय डी सी पोलिस ठाण्यात गेली होती.या वेळी पोलिसांनी आई गीता व पती रोहीत याच्या नातेवाईकांना बोलावुन त्याचे समउपदेश केले होते.या नंतर अंजली सासरी न जाता बजाजनगर येथील कणकधारा सोसाइटी येथे राहणार्या आई कडे गेली होती.काल सकाळी नेहमी प्रमाणे आई गीता या कंपनी मध्ये कामासाठी गेल्या होत्या,या वेळी अंजली ही घरी एकटीच असल्याने तिच्या आईने कंपनीतुन अनेक वेळा फोन कॉल केला पण अंजली फोन उचलत नसल्याने त्यांनी शेजार्यानां या विषयी कळविले.शेजार्यानी खिडकीतुन डोकावुन पाहीले असता त्यानां अंजली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आली.दरम्यान घटनेची माहीती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली व अंजलीला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.मृत तरूणी च्या वडीलांचे चार वर्षा पुर्वी अपघातात निधन झाले असुन आई गीता एका कंपनीत काम करत होती.घरची परीस्थिती हालाखीची असल्याने दहावी नतंर अंजली बजाजनगर येथिल एका कोचिंग क्लासेस मध्ये काम करून आईला हातभार लावत असे.दरम्यान तिची ओळख रोहीत आव्हाड सोबत झाली होती.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते.