खटाव:-हजारो भाविकांच्या उपस्थितीत चोराडे गावच्या भैरवनाथाची यात्रा संपन्न.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा जिल्हाध्यक्ष
खटाव:-सातारा-सांगली जिल्हासह परराज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोराडे ता.खटाव येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यात्रेचा आज मुख्य दिवस (गुलाल खोबरे) असुन विटा -महाबळेश्वर या राज्य महामार्गावर असणारे चोराडे येथील श्री भैरवनाथ मंदिर हे नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून हे देवस्थान प्रसिध्द आहे.प्रत्येक रविवारी तसेच पोर्णिमेला व नवरात्र उत्सवात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात आज यात्रेचा मुख्य दिवस त्यानिमित्ताने….
चोराडे हे गांव विटा-महाब्ळेंश्वर या राज्यमहामार्गांवरील राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असणांरे गांव. पुसेसावळी पंचक्रोशीतील सर्वांत जास्त सधन व बागायतदार कुटुंबे यां गावांत गुण्या गोविंदाने राहत आहेत. उरमोडी-जिहे कटापुर योजनेचा पोट कालवा व गांवाशेजारील नांदणी नदीचा जलसाठा यांमूळे बारमाही पाणी असणांरे असे चोराडे गांव.
गावांत असणांरे ग्रामदैवत भैरवनाथांचे मंदिर हे आजूबाजुंच्या गांवातील भाविकांचे श्रद्धास्थांन.भैरवनाथांच्या देऊळाशेजारी असणारा पश्चिममुखी मारुती भैरवनाथाच्या साथीला सदैव तत्पर असल्याचा भास होतो,गावांत असणारे पुरातन महादेव मंदिर. कोसांवर असणारा शिवस्पर्शाने पावन झालेला रांगडा भूषणगड चोराडे गांवाला खडा पहारा देत तर पूर्वेला असणाऱ्या खडीवरचा (छोटा डोंगर ) खडीआई गावाकडं तोंड करून डोळ्यात तेल घालुन जणु चोराडे गावाचे रक्षण करत आहे असे जाणवते. संपुर्ण चोराडे गावाला श्रीगणेश,मायाक्का,दत्त,खंडोबा,सिध्दनाथ इ. मंदिरांचे गोलांकार अशे अभेद्य सुरक्षेचं कडंच आहे.
भैरवनाथाचं देऊळ एका उंचवट्यावर बांधले आहे त्याला आयताकृती आकार देऊन त्याच्या तिन्ही बाजूला दीड दोन फूट उंच कट्टा बांधला आहे.त्या उंचवट्याला गावातील लोक पवळी असे म्हणतांत. शेजारीच असणांरे राममंदीर व त्यांमंदिरामधील रेखीव अश्या राम,सितामाई,लक्ष्मण देवांच्या सुबक मुर्त्या मन प्रसन्न करतांत.
भैरवनाथ मंदिरांच्या चारी बांजूने चोराडे गाव वसले आहे. साऱ्या जाती धर्मांची लोक चोराडे गांवात सुखानं नांदत आहेत, दरवर्षी गुढिपाडव्यांला नविन याञां कमेटीची नेमणुंक होते व ती याञां कमिटी गांवची याञा भरवणे व याञेंतील सर्व कार्यक्रम योग्यरितीने पार पाडण्यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतांत. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांमध्ये चैत्र कालाष्टमीला भरणांरी चोराडे गांवची यांञा पंचक्रोशींतील सर्वांत मोठी यांञा असते. छबिना,गुलाल खोबरे,फटाक्यांची आताषबाजी व भरगच्च कार्यक्रम दरवर्षी याञेंचे मुख्य आकर्षण असते.
चोराडे गावासंदर्भात एक अख्यायिका सांगितली जाते पुरातन काळी या गावांला शिंगणापूर असं म्हंटलं जायचं. या गांवात गोसावी लोकांची वस्ती होती. ज्यांच्या जमिनी होत्या आणि ते सधनही होते.गावात आता जे महादेव मंदिर आहे त्या मंदिरांच्या शिखरांवरील गुहेसारखी जागां आहे ज्यांमध्ये तीन चार लोक राहू शकतील एवढी जागा आहे.त्याकाळी तिथे कोणी जात नव्हते आणि लक्षही देत नव्हते. त्या शिखरामध्ये एका चोरांचे जोडपं रहायला आलं. बरेच दिवस याची कोणालाच कुणकुणही लागली नव्हती.पण एक दिवशी त्या चोरांच्या बायकोने एका मुलाला जन्म दिला अन् त्या शिखरांतून मुलाच्या रडण्यांचा आवाज येऊ लागला. त्यामुळे लोकांचे त्याकडे लक्ष गेले आणि तो चोर पकडला गेला.आजूबाजूच्या गावातून चोरलेला मालही त्या शिखरांच्या आत लपवलेला सापडला.चोरांच्या या घटनेमुळे शिंगणापुर या गावाला लोक “चोराडे” नावाने संबोधु लागले हि अख्ययिका आजहि जेष्ठ मंडळी सांगतांत.
नंतर गोसाव्यांनी हे गाव सोडले आणि शिखरशिंगणापूरला जाऊन राहिले.अजूनही या गावातून धान्यरुपी शिधा शिखर शिंगणापूरच्या मंदिराला दिला जातो.या गावात “बाग”म्हणून एक गावाबाहेरची जागा आहे.त्या बागेत गोसाव्यांच्या काही समाध्या अजूनही पहायला मिळतात.चोराडे गांवच्या विकासकामात मोलाचं योगदान देत असलेल्या कार्यकर्त्यांचा
आणि त्यांना आर्थिक सहकार्य देऊन प्रोत्साहीत करणार्या अशा दानशुर देणगीदारांचा मोठा वर्ग या गावांत पहायला मिळतो.
गावांतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व ग्रामप्रसारक मंडळांचे श्री भैरवनाथ विद्यालय दरवर्षी किर्तीवंत विद्यार्थी या गावांत घडवत आहेत. या ज्ञानरूपी आकाशगंगेतुन चमकलेले किर्तीवंत विद्यार्थी देश विदेशात नामांकीत IT/Automobile/Medicine क्षेञांमधील कंपन्यामध्ये उच्चपदांवरती काम करीत आहेत. चोराडे गांव हे बैलगाडा शर्यतीचे शौकिन गांव. आजहि 2/3 बैलगाड्या यां पंचक्रोशीत शर्यतीमध्ये प्रसिध्द आहेत.
क्रिकेट, कबड्डी, कुस्ती आणि श्वानशर्यतीवर प्रेम करत असलेले हे गांव सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहांत साजरे करतात. चोराडे गांव हितासाठी एकजूट होऊन काम करणांरे तरुण
राजकारणी या गांवात सापडतील.
चोराडे गावांतील देशप्रेमांसाठी बरीचशी तरुण मूले हि आर्मीमध्ये कार्यरत आहेत.चोराडेमधील कारगील वीर जवान शहिद कमांडो सुरेश जालिंदर पिसाळ हे 6जुलै 2002 मध्ये श्रीनगरमधील सोपियन यां गावी अतिरेक्यांमधील चकमकींत शहिद झालेले आहेत. त्यांचे तीन मजली भव्य स्मारक गावात बांधले आहे,
चैत्र महिन्यातील कालाष्टमीला भैरवनाथास पहाटे दुग्धाभिषेक केला जातो व पुजा बांधली जाते,दुपारी बारा नंतर महिला नवसाचे लोटांगण घेतात तर सायंकाळी गावातील सर्व नवीन जुनी वाहने मंदिरात पुजनासाठी आणली जातात व यानंतर विविध पारंपारिक वाद्यांच्या गजरात छबीना निघतो,दुसर्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी मानाच्या सासनकाठ्या पालखीसह गुलाल खोबरयाची मिरवणूक निघते यावेळी भाविक मोठया श्रद्धेने भैरवनाथाच्या नावाने चांगभल म्हणत पालखीवर गुलाल उधळून नोटांची तोरणे अर्पण करतात,पालखीपुढे मानकरी आपली सेवा मनोभावे पार पाडतात,यात्रेनिमित्त यात्रा कमिटी च्या वतीने मनोरंजनासाठी तमाशा,ऑर्केस्ट्रा,बैलगाडा शर्यती,कुस्त्यांचे मैदान,महिलांसाठी हळदी कुंकु अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.अशा या भैरवनाथाची यात्रा आज संपन्न होत आहे.
भैरवनाथाच्या नावाने चांगभल.
शब्द संकलन :- मा.प्रविण मोकाशी.