आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
शिर्डी:-सावळीविहीर बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक सुशोभीकरणाचा उद्घाटन व विविध विकास कामांचा शुभारंभ ना. विखे यांच्या उपस्थितीत संपन्न! लोकशाही संपुष्टात येत आहे असे म्हणणाऱ्या विरोधकांचेच आता अस्तित्व संपुष्टात येत आहे-ना.विखे पा. यांची विरोधकांवर टीका! सावळीविहीरला पशु महाविद्यालय व सोनेवाडी परिसरात लॉजिस्टिक पार्क, आयटी होणार!
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
शिर्डी( प्रतिनिधी )लोकशाही संपुष्टात येत आहे .असे म्हणणाऱ्या विरोधकांचेच अस्तित्व आता संपुष्टात येत आहे. लोकशाही मजबूत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार व घटनेवर देशाची वाटचाल सुरू आहे .त्यामुळेच आज जगाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला भारत करत आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथे सात कोटी 78 लाख रुपये खर्चून विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरणाचा उद्घाटन समारंभ नुकताच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात नामदार विखे बोलत होते.
नामदार राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांची सावळी विहीर बुद्रुक येथे सिद्धार्थ नगर (लक्ष्मीवाडी) ते सावळीविहीर बुद्रुक अशी रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नंतर विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला .त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्ताने पुष्पहार अर्पण करण्यात आला.व अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, पंचायत समितीच्या सभापती नंदाताई तांबे, सौ. हिराबाई कातोरे, साहेबराव जपे, अशोकराव जमधडे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य, जो संदेश दिला तो आजच्या पिढीने आचरणात आणला पाहिजे. जयंती, पुण्यतिथी साजरी करणे यातून एक ऊर्जा मिळते. असे सांगून बाबासाहेबांनी संघटित व्हा संघर्ष करा हा जो मंत्र दिला, स्वाभिमान जागृत करण्याचे त्यांनी काम केले .त्यातूनच नवपरिवर्तन निर्माण झाले आणि त्यांच्या कल्पनेतून, संकल्पनेतूनच आज पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मजबूत बनला आहे. पंचायत राज व्यवस्था मजबूत झाली आहे. सर्वसामान्य समाजाला सत्तेत सामावून घेण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विश्व नेता म्हणून पाहिले जात आहे. देशाची आर्थिक वाटचाल सुरू आहे. देशात नवीन योजना खुल्या होत आहेत .त्यातून विकासाची दिशा निर्माण होऊन प्रगती होत आहे. कोविडमध्ये देशांमध्ये शंभर टक्के मोफत लस सर्वांना दिली गेली. इतर देशांनाही भारताने लस पुरवली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संकट काळात मोफत धान्य वाटप करण्यात आले. असे असतानाही विरोधक लोकशाही संपुष्टात येत आहे .अशी टीका करत आहेत. मात्र असे म्हणणाऱ्यांचेच अस्तित्वात संपुष्टात येत आहे. असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी मारला. येणारे नवनवीन बदल आपण स्वीकारले पाहिजेत. शिर्डी देवस्थान आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान झाले आहे. येथे मुंबईनंतर सर्वात जास्त वर्दळ असणारे शिर्डी विमानतळ झाले असून येथे आणखी सहाशे कोटी रुपये खर्च करून टर्मिनल इमारत बांधण्यात येणार आहे. राज्यात मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत रेल्वे प्रथम सुरू झाल्या. समृद्धी महामार्ग जवळून जात आहे. त्यामुळे येथे विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सावळी विहीर येथील शेतकी फार्म मध्ये लवकरच पशु महाविद्यालय करण्यात येणार आहे. त्यास मंजुरी मिळाली आहे. येथे पशु महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच पशु संशोधन केंद्र ही करण्यात येणार आहे. असे सांगत
सावळीविहीर जवळच सोनेवाडी भागामध्ये असणाऱ्या शेती महामंडळाच्या पाचशे एकर जागेमध्ये लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. या सर्वांचा फायदा या भागाला होणार आहे .रोजगार निर्मिती होणार आहे. खंडकरी यांच्या जमिनीचा प्रश्न एक महिन्याच्या आत संपूर्ण पणे सुटणार आहे. तसेच पेंटिंग असणारी मोजणी प्रकरणे आता विना विलंब होणार आहे व नकाशे घरपोच देण्यात येणार आहे. असे विविध निर्णय ,विविध नवनवीन योजना सरकार राबवत आहे. असे सांगत येथील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासने त्यांनी यावेळी दिले. तसेच येथील नितीन बाराहाते यांचा लहान मुलगा उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला क्रिकेटपटू रोहित शर्मा ने दत्तक घेतले आहे. आपणही त्याला हवी ती मदत करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणामुळेच देशात लोकशाही व्यवस्था उभी राहिली. डॉक्टर बाबासाहेबांनी जे मूल्य व विचार दिले त्यातूनच आज समाज, देश विकासाकडे वाटचाल करत आहे व त्यांच्या विचारानेच भविष्यात प्रत्येकाने पुढे गेले पाहिजे. निर्व्यसनी झालं पाहिजे. सर्व जाती समाज यांना बरोबर घेऊन काम करत राहणं यातूनच देशाची प्रगती साधते. असं यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावळी विहीर बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत प्रास्ताविक केले व विविध मागण्याही केल्या. विकास कामा संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सौ. शालिनीताई विखे व खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळीविहीर बुद्रुक गावचा मोठा विकास होत असून या सर्व नेत्यांचे यावेळी ओमेश जपे यांनी गावाच्या वतीने आभार मानले. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब जनार्दन जपे व पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबा आगलावे यांनीही यावेळी भाषणे केली.
या कार्यक्रमात अपंग व दिव्यांग मुलींना तीन चाकी सायकलचे नामदार विखे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सावळी विहीर ग्रामपंचायतचे उपसरपंच विकास जपे, सोसायटीचे चेअरमन कैलासराव सदाफळ, किशोर आगलावे, सावळीविहीर सह परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थ महिला भगिनी एकता तरुण मंडळ ,अमरदीप संघटना तसेच विविध पक्ष संघटना ,ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सदस्य, पदाधिकारी, ग्रामपंचायती ग्राम विकास अधिकारी सोनवणे, आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला यावेळी उपस्थित होते.